मंजुर येथील बंधाऱ्याचा भराव पहिल्याच पाण्यात गेला वाहून 

नगर ः मंजुर (ता.कोपरगाव) येथील कोल्हापुर बंधाऱ्याचा भराव पुन्हा एकदा वाहून गेला आहे. निसर्ग चक्रीवादळामुळे झालेल्या जोरदार पावसाने नांदूर मधमेश्वर बंधाऱ्यातून गोदावरी नदीत गुरुवारी पाणी सोडल्याने हा भराव वाहून गेला.
मंजुर (ता.कोपरगाव) येथील कोल्हापुर बंधाऱ्याचा भराव पुन्हा एकदा वाहून गेला आहे
मंजुर (ता.कोपरगाव) येथील कोल्हापुर बंधाऱ्याचा भराव पुन्हा एकदा वाहून गेला आहे

नगर  ः मंजुर (ता.कोपरगाव) येथील कोल्हापुर बंधाऱ्याचा भराव पुन्हा एकदा वाहून गेला आहे. निसर्ग चक्रीवादळामुळे झालेल्या जोरदार पावसाने नांदूर मधमेश्वर बंधाऱ्यातून गोदावरी नदीत गुरुवारी पाणी सोडल्याने हा भराव वाहून गेला. तब्बल दहा महिन्यानंतर आठ दिवसापूर्वी बंधाऱ्याचा वाहून गेलेला भराव भरण्याचे काम सुरु केले होते. आता पावसाळा सुरु होत असल्याने बंधाऱ्याचा भराव भरला जाईलच याची शाश्वती नसल्याने नदीकाठचे शेतकरी मात्र हतबल झाले आहेत. 

कोपरगाव तालुक्यातील मंजुर गावासह परिसरातील शेतीसाठी गोदावरी नदीवर १९८९-९० मध्ये संजीवनी सहकारी साखर कारखान्याच्या मदतीने गोदावरी नदीवर कोल्हापुर पद्धतीचा बंधारा बांधण्यात आला. गेल्यावर्षी आॅगस्ट महिन्यात नाशिक जिल्ह्यात झालेल्या जोरदार पावसामुळे येथील बंधाऱ्याचा भराव वाहून गेला. सोबत सुमारे पंधरा शेतकऱ्यांच्या जमिनीही वाहून गेल्या. त्यावेळी शेतकऱ्यांनी तक्रार केल्यावर लोकप्रतिनिधींनी बैठका घेऊन शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याचे आश्वासन दिले. मात्र अजूनही भरपाई मिळालेली नाही. 

बंधाऱ्याचा भराव भरणार असल्याचे सांगितले आणि आता कुठे पावसाळ्याच्या तोंडावर हे काम सुरु केले. मात्र चार दिवस काम होत नाही तोच निसर्ग चक्रीवादळाने नाशिक भागात झालेल्या जोरदार पावसामुळे नांदूर मधमेश्वर बंधाऱ्यातून १६ हजार क्युसेक पाणी सोडण्यात आले. त्यामुळे चार दिवसांपूर्वी टाकलेला भराव वाहून गेला. जमिनी आणि भराव वाहून गेला त्यास तब्बल दहा महिन्यांचा कालावधी उलटून गेला आणि आता ऐन पावसाळ्याच्या तोंडावरच नेमके काम सुरु कसे केले असा प्रश्न उपस्थित करत शेतकरी या कामावरच शंका उपस्थित करत आहेत. 

चौथ्यांदा फुटलाय बंधारा  पुराच्या पाण्याने होत्याचे नव्हतं केलेल्या मंजुर गावातील या गोदाकाठच्या बंधाऱ्यांचे काम करताना गाईडवॉल केलेले नाहीत. दोन वर्षांपूर्वी केलेला तात्पुरता माती आणि वाळूचा भराव वाहून गेला आणि नदीने प्रवाहच बदलला आहे. हा बंधारा तिसऱ्यांदा फुटला आहे. याआधी २००६ आणि २०१७ मध्ये बंधारा फुटला होता. तरीही दखल घेतली नसल्याने यंदा पंधरा एकर शेती, सात विहिरी, अकरा पाइपलाइन वाहून गेल्या आहेत. दोन वर्षांपूर्वी हा बंधारा फुटला, त्यानंतर पुन्हा साइड भराव टाकण्यासाठी याच शेतकऱ्यांनी आपल्या शेतातील माती दिलेली होती. आता पुन्हा यंदा पावसाळ्याच्या तोंडावरच चौथ्यांदा भराव वाहून गेला. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com