सिंधुदुर्ग जिल्ह्यात जोरदार वाऱ्यामुळे काजू बागांचे नुकसान

जोरदार वाऱ्यामुळे काजू बागांचे झालेले नुकसान
जोरदार वाऱ्यामुळे काजू बागांचे झालेले नुकसान

सिंधुदुर्ग : गेले दोन-तीन दिवस जिल्ह्यात वाहत असलेल्या जोरदार वाऱ्याचा काजू बागांना फटका बसला आहे. वाऱ्यामुळे कच्चे काजू आणि मोहर गळून पडला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले.

सिंधुदुर्गात गेले दोन तीन दिवस वाऱ्याचा वेग वाढला आहे. सकाळच्या सत्रात वाऱ्याचा वेग अधिक होता. या जोरदार वाऱ्याचा फटका काजू पिकाला बसला. काजूच्या झाडावरील कच्चे काजू वाऱ्याने गळून पडले आहेत, तर मोहर आणि झाडाची पाने देखील गळून पडली आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. सह्याद्रीच्या पायथ्याशी असलेल्या कणकवली तालुक्यातील फोंडाघाट, हरकुळ, नरडवे, कनेडी, तर वैभववाडी तालुक्यातील लोरे, आर्चिणे, कुर्ली, खांबाळे, नावळे, शिराळे, करूळ, जांभवडे, कुभंवडे, अरूळे, निमअरूळे, सांगुळवाडी या गावातील काजु बागांचे नुकसान अधिक प्रमाणात झाले आहे.

त्यातच जिल्ह्यात उष्मा वाढला असून त्याचाही परिणाम काजू पिकावर होत आहे. काजूचा मोहोर अधिक तापमानामुळे करपला जात आहे. यावर्षी काजू हंगाम दरवर्षीपेक्षा दोन महिने उशिराने सुरू झाला. काजूला मोहर येण्याची प्रकिया सुरू झाल्यापासून सातत्याने जिल्ह्यात ढगाळ वातावरण राहिले. त्यातच शेतकऱ्यांना काजूचे पीक साधेल असे वाटत असतानाच दोन दिवसांतील वाऱ्यामुळे पिकाचे मोठे नुकसान झाले आहे. शुक्रवारी (ता. २८) वाऱ्याचा वेग मंदावला असून उष्णता वाढली आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com