पुणे ः गेल्या आठ ते दहा वर्षांत महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनी राज्य, परराज्यातील बाजारपेठेचा अंदाज घेत पीक बदलाला सुरवात केली आहे. पारंपरिक पिकांचे लागवड क्षेत्र मर्यादित ठेऊन मागणीनुसार हंगामी भाजीपाला, फुलशेती, फळपिके, मसाला पिके शेतशिवारात दिसू लागली आहेत. त्यातून पीक निहाय समूह (क्लस्टर) विकसित झाले असून एकमेकांच्या साथीने शेती अर्थकारणाला वेगळी दिशा मिळू लागली आहे. कृषी दिनानिमित्त ‘ॲग्रोवन’ने राज्यभर केलेल्या पाहणीतून वेगळे आणि सकारात्मक असे शेतीतील बदलाचे चित्र पुढे आले.
सध्या राज्यात एक लाखांहून अधिक शेतकरी गट आणि सुमारे ५०० शेतकरी उत्पादक कंपन्या आहेत. या माध्यमातून शेतकऱ्यांनी विविध शहरांत थेट विक्री व्यवस्था उभी केली. काही गट शेतमाल निर्यातीमध्ये देखील उतरले आहेत. या संघटित प्रयत्नांचा फायदा गाव आणि शेतशिवारांच्या विकासाला होत आहे. शेतकऱ्यांच्या प्रयत्नातून नव्याने विकसित होत असलेल्या विभागनिहाय पीक बदलाला कृषी विभाग आणि शासनाने धोरणात्मक दिशा देण्याची गरज आहे.
शेतकरी बदलतो आहे पाररंपरिक पिक लागवडीतील घटत चाललेले नफ्याचे प्रमाण, बाजारपेठेचे बदलते स्वरूप, दराबाबतची अनिश्चितता, आॅनलाईन प्लॅटफॉर्ममुळे निर्माण झालेल्या नव्या संधी, गटशेतीमुळे प्रयत्नांना मिळालेली बळकटी, निर्यातीच्या उपलब्ध झालेल्या संधी, प्रक्रिया उद्योगांचे वाढते जाळे, ज्ञान-तंत्रज्ञानाची उपलब्धता, स्मार्ट फोनमुळे खुला झालेला माहितीचा स्रोत अशा अनेक कारणांमुळे शेतकरी पारंपरिक पीक पध्दतीत बदल करीत नव्या युगाला सामोरा जात असल्याचे सकारात्मक चित्र राज्याच्या कानाकोपऱ्यात दिसू लागले आहे.
असे आहेत बदल ः
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.