बियाणे बदलून देण्याच्या आदेशाची अंमलबजावणी न करणाऱ्यांवर कारवाईची मागणी

शासनाने शेतकऱ्यांना बियाणे बदलून देण्याचे आदेश दिलेले असतानाही स्थानिक प्रशासन याबाबत गंभीर नाही. त्यामुळे दोषींविरुद्ध कारवाईची मागणी संघटनेने केली आहे. -विनायक सरनाईक, जिल्हाध्यक्ष, रयत क्रांती संघटना, बुलडाणा.
संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

अकोला  ः या हंगामात लागवड केलेल्या सोयाबीन बियाण्यांची उगवण न झाल्याने शेतकरी अडचणीत आले आहेत. या शेतकऱ्यांना बियाणे बदलून देण्याबाबत कृषिमंत्री दादा भुसे यांनी आदेश दिले. मात्र, अद्यापही शेतकऱ्यांना बियाणे मिळाले नाही. त्यामुळे आदेशाची अंमलबजावणी न करणाऱ्या ‘महाबीज’वर कारवाई करून शेतकऱ्यांना नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी रयत क्रांती संघटनेने कृषिमंत्र्यांकडे केली. 

याबाबत विनायक सरनाईक यांनी तक्रार केली. त्यांनी म्हटले की, चिखली तालुक्यात शेतकऱ्यांनी लागवड केलेले सोयाबीन बियाणे उगवले नाही, याबाबत तक्रार करूनही  शेतकऱ्यांना बियाणे बदलून देण्यात आले नाही. निकृष्ट बियाण्यांमुळे शेतकऱ्यांना दुबार पेरणी करावी लागली. काही शेतकऱ्यांकडे बियाणे घेण्याची व्यवस्था नसल्याने त्यांची पेरणी रखडली. महाबीजचे बियाणे उगवले नसल्याच्या असंख्य तक्रारी आहेत.

या तक्रारींची दखल घेत कृषी विभागाच्या अहवालाची वाट न पाहता बियाणे बदलून देण्याबाबत कार्यवाही करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. मात्र चिखली तालुक्यातील शेतकऱ्यांना बियाणे बदलून दिले गेले नाही. यामुळे शेतकरी अडचणीत आहेत. अवर सचिवांच्या आदेशाचे पालन न करणाऱ्यांविरुद्ध कारवाई करावी.  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com