महाविकास आघाडी सरकारने जनतेचा विश्‍वासघात केला : देवेंद्र फडणवीस

चोहट्टा बाजार येथील सभेत बोलताना विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस
चोहट्टा बाजार येथील सभेत बोलताना विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस

अकोला : सरसकट कर्जमाफी देऊ, शेतकऱ्यांना चिंतामुक्त करू, असे आश्‍वासन देऊन सत्तेत आलेल्या महाविकास आघाडी सरकारने जनतेचा विश्‍वासघात केला आहे, अशी टीका माजी मुख्यमंत्री तथा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली.

जिल्हा परिषद निवडणुकीच्या प्रचारासाठी चोहोट्टा बाजार येथे शनिवारी (ता. ४) आयोजित सभेत श्री. फडणवीस बोलत होते. या वेळी ते म्हणाले की, या सरकारची कर्जमाफी ही शहरातील चौकात प्लॉटविक्रीच्या जाहिराती लावतात त्यासारखी आहे. जाहिरातीत प्लॉट १० हजारांत मिळेल, असे ठळक लिहिले जाते आणि त्याखाली छोट्या अक्षरात अटी व शर्ती लागू, असे लिहितात. सामान्य माणूस हे वाचून फसतो. तसाच राज्यातील शेतकरी या सरकारच्या कर्जमाफीत फसला आहे. काही दिवसांपूर्वी कर्जमाफीचा जीआर आला. यात २०१५ ते सप्टेंबर २०१९ या काळात ज्यांनी कर्ज घेतले असेल व थकीत असेल, त्यांनाच कर्जमाफी मिळणार, असे म्हटले. शिवाय, केवळ पीककर्जाची माफी दिली जाणार आहे.

वास्तविक, राज्यात आॅक्टोबरच्या तिसऱ्या आठवड्यात सर्वत्र झालेल्या अतिपावसाने शेतकऱ्यांचा हंगाम वाया गेला. पीक उत्पादन खर्चही परत मिळाला नाही. शेतकऱ्यांनी कर्ज काढले आणि शेतीसाठी वापरले. परंतु, हे सरकार आॅक्टोबरमध्ये ज्यांनी कर्ज काढले असेल, त्यांना कर्जमाफी देणार नाही. या सरकारची शिवभोजन ही घोषणाही फसवी आहे, असेही फडणवीस म्हणाले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com