सांगली जिल्ह्यात अतिवृष्टीने नुकसान कोटींचे;पंचनामे केवळ २२० हेक्टरचे

सांगली ः जिल्ह्यातील मिरज, खानापूर, पलूस, आटपाडी, वाळवा आणि तासगाव तालुक्यात पंधरा दिवसांपूर्वी झालेल्या अतिवृष्टीमुळे खरीप पिकांसह फळबागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. कृषी विभागाने २२० हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले असल्याचा अहवाल तयार केला आहे.
संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

सांगली  ः जिल्ह्यातील मिरज, खानापूर, पलूस, आटपाडी, वाळवा आणि तासगाव तालुक्यात पंधरा दिवसांपूर्वी झालेल्या अतिवृष्टीमुळे खरीप पिकांसह फळबागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. कृषी विभागाने २२० हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले असल्याचा अहवाल तयार केला आहे. वास्तविक कोट्यावधींचे नुकसान झाले असल्याने शेतकऱ्यांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे.

जिल्ह्यात गेल्या पंधरा दिवसांत मुसळधार पाऊस झाला. आटपाडी, खानापूर, तासगाव आणि मिरज या चार तालुक्यांत चार वेळा अतिवृष्टी झाली आहे. आटपाडी तालुक्यात तर चार दिवसांत वर्षभराचा पाऊस झाला आहे. दुष्काळग्रस्त पट्ट्यातील सर्व तालुक्यांत सरासरीपेक्षा अधिक पाऊस झाला आहे. हा पाऊस पीक काढणीच्या वेळी झाला. मिरज तालुक्यातील कसबे डिग्रज, समडोळी, कर्नाळ, नांद्रे तसेच वाळवा तालुक्यात सोयाबीन, भुईमूग, भाजीपाला पिकांत पाणी साचून आहे.

पलूस, तासगाव आणि आटपाडी तालुक्यातील ज्वारी, भाजीपाला आणि बाजरी पिके अतिवृष्टीमुळे कुजण्याच्या मार्गावर आहेत. त्यातच द्राक्ष बागांमध्ये पाणी साचल्याने छाटणीही खोळंबली आहे.

अतिवृष्टीमुळे जिल्ह्यात सुमारे २२० हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले असल्याचा अहवाल कृषी विभागाने तयार केला आहे. त्यानुसार पंचनामे केले जाण्याची शक्यता आहे. आटपाडी तालुक्यात अतिवृष्टीमुळे डाळिंबाचे फक्त १०० हेक्टर नुकसान झाले असल्याचे या अहवालात नमूद केले आहे.

परंतु, तालुक्यात सरासरीपेक्षा अधिक पाऊस पडला आहे. डाळिंबाच्या बागांमध्ये पाच ते सहा दिवस पाणी साचून राहिले होते. त्यामुळे फळकूज होण्यास सुरवात झाली आहे. नदी आणि ओढ्याकाठी असलेल्या बागा पाण्याचा प्रवाहाने उन्मळून पडल्या आहेत. त्यामुळे कृषी विभागाने तयार केलेल्या अहवालाबाबत साशंकता उपस्थित होऊ लागली आहे.

शेतकऱ्यांनी सुरु केल्या तक्रारी अतिपावसामुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. अशात केवळ २२० हेक्टरवरील पिके कशी बाधित झाली,  असा प्रश्न उपस्थित होऊ लागला आहे. मुळात पावसाने बाधित झालेले क्षेत्र अधिक आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी तक्रारी करण्यास सुरवात केली आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com