पुणे, पिंपरी-चिंचवडमधील टाळेबंदी जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या मुळावर 

पुणे ः ‘कोरोना’च्या पार्श्वभूमीवर पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरांसह जिल्ह्यातील विविध तालुक्यांमध्ये सोमवारी (ता.१३) मध्यरात्रीपासून पुन्हा संपूर्ण टाळेबंदी जाहीर करण्यात आली आहे. ही टाळेबंदी शेतकऱ्यांच्या मुळावर आली आहे. या दरम्यान बाजार समित्यांसह थेट भाजीपाला पुरवठा बंद केल्याने शेतकऱ्यांवर भाजीपाला फेकून देण्याची वेळ आली आहे. यामुळे शेतकऱ्यांना मोठ्या नुकसानीला सामोरे जावे लागत आहे.
संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

पुणे  ः ‘कोरोना’च्या पार्श्वभूमीवर पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरांसह जिल्ह्यातील विविध तालुक्यांमध्ये सोमवारी (ता.१३) मध्यरात्रीपासून पुन्हा संपूर्ण टाळेबंदी जाहीर करण्यात आली आहे. ही टाळेबंदी शेतकऱ्यांच्या मुळावर आली आहे. या दरम्यान बाजार समित्यांसह थेट भाजीपाला पुरवठा बंद केल्याने शेतकऱ्यांवर भाजीपाला फेकून देण्याची वेळ आली आहे. यामुळे शेतकऱ्यांना मोठ्या नुकसानीला सामोरे जावे लागत आहे. 

कोरोना संकटामधील पहिल्या टाळेबंदीमध्ये काही अंशी बाजार समित्या सुरु होत्या. मात्र पुरवठा साखळी विस्कळीत झाल्याने शेतीमालाच्या प्रचंड नुकसानीला शेतकऱ्यांना सामोरे जावे लागले होते. याही परिस्थितीमध्ये काही शेतकऱ्यांनी थेट शेतमाल पुरवठा सुरु करत, नुकसान कमी करण्याचा प्रयत्न केला होता. यामध्ये शेतकरी ते ग्राहक ही साखळी अधिक बळकट झाली. मात्र आताच्या नव्याने केलेल्या टाळेबंदीमध्ये पुणे बाजार समितीसह तालुक्यांमधील बाजार समित्या देखील बंद राहिल्याने शेतीमाल खरेदी विक्री ठप्प झाली आहे. तसेच थेट शेतीमाल पुरवठ्यावर देखील बंदी घालण्यात आल्याने शेतकऱ्यांना पुन्हा एकदा शेतीमाल फेकून देण्याची वेळी आली आहे. 

दरम्यान, सध्या विविध शेतीमालाची काढणी सुरु आहे. अशा परिस्थितीमध्ये शेतीमाल काढला नाहीतर नुकसान होण्याचा धोका असतो. परंतु, टाळेबंदीमुळे झाडांवरील शेतीमाल काढून फेकण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली असून यासाठीची मजुरी देखील अंगावर पडणार आहे. 

याबाबत नारायणगाव येथील प्रकाश पाटे म्हणाले, की माझी ४ एकर क्षेत्रावर भेंडी, गवार, फ्लॉवर आणि वांगी यांचे उत्पादन सुरु होते. प्रशासनाने नव्याने केलेल्या टाळेबंदीमुळे शहरातील भाजीपाला विक्री बंद झाली आहे. यामुळे रोज साधारण ५०० किलो भाजीपाल्याचे नुकसान आहे. सध्या सर्वच भाजीपाल्याला ४० रुपये प्रतिकिलोचा दर मिळत आहे. मात्र आता १० दिवस सगळेच बंद असल्याने दररोजचे सुमारे २० हजार रुपयांचे नुकसान आहे. शहरातील थेट भाजीपाला पुरवठ्यावर सरकारने बंदी घालायला नको होती.   

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com