यवतमाळमध्ये ‘आधार’अभावी थकले कापूस उत्पादकांचे २१ कोटींचे चुकारे

संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

यवतमाळ  ः कापूस चुकाऱ्यासाठी बॅंक खाते आधार लिंकची सक्‍ती करण्यात आली आहे. परिणामी जिल्ह्यात तब्बल २१ कोटी रुपयांचे चुकारे रखडले असून, त्यामुळे शेतकऱ्यांना नाहक मनस्ताप सोसावा लागत आहे. 

सीसीआयचा एजंट म्हणून महाराष्ट्र राज्य सहकारी कापूस उत्पादक पणन महासंघाकडून कापूस खरेदी करण्यात आली. यवतमाळ जिल्ह्यात १३२ कोटी रुपयांची कापूस खरेदी पणन महासंघाने केली आहे. त्यापैकी १११ कोटी रुपयांचे चुकारे शेतकऱ्यांच्या खात्यांत जमा झाले आहेत. उर्वरित २१ कोटी रुपयांचे चुकारे थकले आहेत. चुकारे अदा करताना बॅंक खाते आधार लिंक असण्याचा निकष लावण्यात आला आहे. त्याचा फटका बसत कापसाचे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यांत जमा होण्यास विलंब लागत आहे. कापूस विकल्यानंतर दहा दिवसांत चुकारे करण्याचा नियम आहे.

परंतु, पणनला कापूस दिलेल्या अनेक शेतकऱ्यांचे खाते आधार लिंक नाही. खाते आधार लिंक करण्याची प्रक्रिया राबविण्याच्या सूचना कर्जमाफीकरिता यापूर्वीच देण्यात आल्या आहेत. त्यामुळे हे काम गतीने होणे अपेक्षित असताना काही बॅंकांची याबाबतची प्रक्रिया संथ असल्याचा आरोप होत आहे. पणन महासंघाने लवकरात लवकर चुकारे शेतकऱ्यांच्या खात्यांत जमा व्हावेत, यासाठी प्रयत्न सुरू असल्याची माहिती दिली.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com