सातारा ः जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी घरातील सोयाबीन बियाण्याची उगवण क्षमता चाचणी घेऊन त्याचा पेरणीसाठी जास्तीत जास्त वापर करावा. सोयाबीन चांगली उगवण होण्यासाठी बीजप्रक्रिया आवश्यक असल्याने शेतकऱ्यांनी पेरणीपूर्वी बीजप्रक्रिया करावी. शेतकऱ्यांच्या मागणीनूसार शेताच्या बांधावर खते पोचवली जाणार आहेत, यासाठी शेतकऱ्यांनी गट किंवा समूह तयार करून मागणी केल्यास त्यांना कृषी सेवा केंद्राच्या माध्यमातून बियाणे, खते दिली जाणार असल्याचे जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी महेश झेंडे यांनी सांगितले.
पाटण (जि. सातारा) येथे सोयाबीन बियाणे उगवण क्षमता चाचणी कार्यक्रमात श्री. झेंडे बोलत होते. यावेळी कराड उपविभागीय कृषी अधिकारी मनोज वेताळ, तालुका कृषी अधिकारी भुपाल बुधावले, मंडल कृषी अधिकारी अभिजीत पाटील, कृषी पर्यवेक्षक मोहन निकम, राजेंद्र जाधव, कृषी सहायक संतोष चव्हाण, सुरज बागुल, नितिन लोखंडे आदी उपस्थित होते. श्री. झेंडे म्हणाले,की आंब्याच्या परंपरागत जातींऐवजी रत्ना, सिंधू, आम्रपाली यासारख्या जातीची लागवड करावी. हुमणीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रकाश सापळे लावावेत. यावेळी त्यांनी रासायनिक खतांचा वापर, एकात्मिक किड व्यवस्थापन याविषयी मार्गदर्शन केले. पाटण येथे चंद्रकांत चौधरी यांच्या शेतातील हुमणी नियंत्रक सापळा प्रात्याक्षिक घेण्यात आले.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.