सांगली जिल्ह्यात पुराचे पाणी दुष्काळग्रस्त भागाला

सांगली ः पुराच्या वाहून जाणाऱ्या पाण्यातून दुष्काळग्रस्त जत, आटपाडी, कवठेमहांकाळ, खानापूर तालुक्यातील तलाव भरून देण्यासाठी म्हैसाळ उपसा सिंचन योजना सुरू केली आहेत.
पुराचे पाणी दुष्काळग्रस्त भागाला देण्यासाठी म्हैसाळ उपसा सिंचन योजना सुरु करण्यात आली आहे.
पुराचे पाणी दुष्काळग्रस्त भागाला देण्यासाठी म्हैसाळ उपसा सिंचन योजना सुरु करण्यात आली आहे.

सांगली  ः पुराच्या वाहून जाणाऱ्या पाण्यातून दुष्काळग्रस्त जत, आटपाडी, कवठेमहांकाळ, खानापूर तालुक्यातील तलाव भरून देण्यासाठी म्हैसाळ उपसा सिंचन योजना सुरू केली आहेत. हे पाणी थेट शेतीला, पिण्यासाठी आणि तेथील भूजल पातळी उंचावण्यास फायद्याचे ठरणार आहे. दुष्काळग्रस्त तालुक्यांतील तलावांची क्षमता पाहून, गरज पाहून त्यात पाणी साठवले जाईल, अशी माहिती पाटबंधारे विभागाच्या सूत्रांनी दिली. 

कृष्णा काठावर एकीकडे महापुराची भिती दाटली असताना दुसरीकडे दुष्काळ पडू नये, अशी प्रार्थना करणारा भाग सुखावला आहे. कोयना धरणातून ५६ हजार आणि वारणा धरणातून १६ हजार क्‍युसेकने विसर्ग सुरू आहे. त्यामुळे नदीच्या पाणी पातळीत मोठी वाढ झाली असून पूर आला आहे. दरवर्षी पुराचे पाणी दुष्काळग्रस्त पट्ट्याला द्यावे,अशी वारंवार मागणी केली जायची. गेल्यावर्षी महापुराने हाहाकार उडाला होता. त्यानंतर विधानसभा निवडणुका झाल्या आणि त्यात हाच मुद्दा केंद्रस्थानी राहिला. 

दरम्यान, मार्च महिन्यात जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी बैठकीत पुराचे पाणी दुष्काळग्रस्त भागांत देण्याची योजना तयार करण्याचे आदेश दिले होते. त्यातून २० टीएमसी पाणी दुष्काळग्रस्त भागांत देण्याचे नियोजन केले आहे. म्हैसाळ योजनातून वर्षभर १३ टीएमसी पाणी उचलण्याची क्षमता आहे. यापैकी पुराच्या कालावधीत पाच ते सहा टीएमसी पाणी उचलून ते जत, कवठेमहांकाळ, मिरज तालुक्यातील तलावात सोडले जाणार आहे. म्हैसाळ उपसा सिंचन योजनेचे चार पंप सुरू करून पुराचे पाणी उचलले जात आहे. येत्या दोन ते तीन दिवसांत जत तालुक्यात म्हैसाळचे पाणी पोहोचेल.

टेंभू योजनेतून खानापूर, आटपाडी, तासगाव आणि सांगोला तालुक्‍यातील तलाव भरून घेतले जाणार आहेत. कडेगाव तालुक्यासह लाभक्षेत्रातील अन्य तालुक्यांतील बहुतांशी तलाव पावसाच्या पाण्यानेच भरलेले आहेत. परंतु तरीही जे तलाव क्षमतेपेक्षा कमी प्रमाणात भरलेले आहेत ते तलाव पूर्ण  क्षमतेने भरून घेऊन पाणी पुढे सोलापूर जिल्ह्यातील सांगोला तालुक्यात दिले जाणार आहे.

दरम्यान, ताकारी व आरफळ योजनेतून पाणी सोडले जाणार नाही. पूर्व नियोजनात ताकारी योजनेतून पाणी सोडले जाण्याचे संकेत देण्यात आले होते.  दोन्ही योजनांचे पंप  सुरू करण्यात आले. दुष्काळग्रस्त तालुक्‍यातील तलावांची क्षमता पाहून, गरज पाहून त्यात पाणी साठवले जाईल. सहा तालुक्‍यांना त्याचा फायदा होणार आहे. ताकारी योजनेच्या कार्यक्षेत्रातील तलावांत पाणी सोडण्याची गरज नाही, असे पाटबंधारे विभागाच्या सूत्रांनी सांगितले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com