पालकमंत्र्यांनी धान्यवाटपाबाबत तक्रारींचे निवारण करावे ः उपमुख्यमंत्री अजित पवार

मुंबई : ‘कोरोना’च्या पार्श्वभूमीवर गरजू नागरिकांना रेशनदुकानांमधून दिल्या जाणाऱ्या धान्यवाटपाचे प्रमाण वाढवण्यात आले आहे. या वाटपात गैरप्रकार होऊ नये. धान्यवाटप सुरळीत, विनातक्रार व्हावे. वाटपाबाबत कुठलीही तक्रार आल्यास तिचे तत्काळ निवारण करावे आणि शासनाची विनाकारण होणारी बदनामी टाळावी यासाठी सर्व पालकमंत्र्यांनी आपापल्या जिल्ह्यात व्यक्तिशः लक्ष घालून जबाबदारी घ्यावी, असे आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सर्व जिल्ह्यांच्या पालकमंत्र्यांना पत्र लिहून केले आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार
उपमुख्यमंत्री अजित पवार

मुंबई : ‘कोरोना’च्या पार्श्वभूमीवर गरजू नागरिकांना रेशनदुकानांमधून दिल्या जाणाऱ्या धान्यवाटपाचे प्रमाण वाढवण्यात आले आहे. या वाटपात गैरप्रकार होऊ नये. धान्यवाटप सुरळीत, विनातक्रार व्हावे. वाटपाबाबत कुठलीही तक्रार आल्यास तिचे तत्काळ निवारण करावे आणि शासनाची विनाकारण होणारी बदनामी टाळावी यासाठी सर्व पालकमंत्र्यांनी आपापल्या जिल्ह्यात व्यक्तिशः लक्ष घालून जबाबदारी घ्यावी, असे आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सर्व जिल्ह्यांच्या पालकमंत्र्यांना पत्र लिहून केले आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सर्व पालकमंत्र्यांना पत्र लिहून रेशनदुकानांमधून पुरेसं अन्नधान्य उपलब्ध केलं जात असतानाही तक्रारी वाढत असल्याकडे लक्ष वेधलं आहे. शासनाने रेशनिंगसाठी उपलब्ध केलेल्या धान्यसाठ्याची माहितीही त्यांनी पत्रात दिली आहे. श्री. पवार पत्रात म्हणतात, की राज्यातील रेशनिंगवरील अन्नधान्याचा कोटा ३.८७ लाख मेट्रिक टनांवरून ७.७४ लाख मेट्रिक टनांवर नेण्यात आला आहे. केशरी कार्डधारकांना १.५२ लाख मेट्रिक टन अतिरिक्त धान्य उपलब्ध करून देण्यात आले आहे. गरजू नागरिकांना पुरेसे धान्य मिळावे, धान्याचे सुरळीत वाटप व्हावे याकडे लक्ष देण्याची गरज आहे. त्यासाठी सर्वंच पालकमंत्र्यांनी आपापल्या जिल्ह्यात व्यक्तिशः लक्ष घालावे आणि अन्नधान्य वाटपातील तक्रारी दूर करण्याची जबाबदारी घ्यावी.

राज्यातील कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर शासकीय यंत्रणा सर्वस्तरावर उत्तम काम करीत आहेत. राज्याच्या अन्न व नागरी पुरवठा विभागामार्फत ७ कोटी नागरिकांना तीन महिन्यांसाठी २ रुपये प्रतिकिलो दराने गहू आणि ३ रुपये प्रतिकिलो दराने तांदूळ रेशन दुकानांच्या माध्यमातून देण्यात येत आहे. केंद्र सरकारकडून जाहीर झालेल्या ५ किलो मोफत तांदळाचे वाटपही सुरु आहे. ज्यांच्याकडे केशरी कार्ड आहे त्यांच्यासाठी ८ रुपये प्रतिकिलो दराने गहू आणि १२ रुपये प्रतिकिलो दराने तांदूळ वाटपाचा निर्णय घेतला आहे. शिधावाटप यंत्रणेसंदर्भातील सूचना व तक्रारींसाठी राज्य शासनाने राज्यस्तरावर १८००२२४९५० आणि १९६७ हे टोल फ्री दूरध्वनी क्रमांक दिले आहेत. त्यावर संपर्क साधून सूचना द्याव्यात, तक्रारी दूर कराव्यात, असेही त्यांनी पत्रात म्हटलं आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com