एचटीबीटीबाबत केंद्र सरकारकडे पाठपुरावा करण्याचा निर्णय घेऊ : गृहमंत्री अनिल देशमुख

नागपूर ः एचटीबीटीचा विषय केंद्र सरकारच्या अखत्यारीतील आहे. केंद्राकडून याला परवानगी मिळालेली नाही. तरीसुद्धा कृषिमंत्री दादा भुसे यांच्यासोबतच शेतकरी संघटनेच्या प्रतिनिधींची बैठक घडवून आणत याबाबत केंद्राकडे पाठपुराव्याचा निर्णय घेतला जाईल, असे प्रतिपादन गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केले.
शेतकरी संघटनेच्या प्रतिनिधींसोबत एचटीबीटी या विषयावर संवाद साधताना गृहमंत्री अनिल देशमुख.
शेतकरी संघटनेच्या प्रतिनिधींसोबत एचटीबीटी या विषयावर संवाद साधताना गृहमंत्री अनिल देशमुख.

नागपूर  ः एचटीबीटीचा विषय केंद्र सरकारच्या अखत्यारीतील आहे. केंद्राकडून याला परवानगी मिळालेली नाही. तरीसुद्धा कृषिमंत्री दादा भुसे यांच्यासोबतच शेतकरी संघटनेच्या प्रतिनिधींची बैठक घडवून आणत याबाबत केंद्राकडे पाठपुराव्याचा निर्णय घेतला जाईल, असे प्रतिपादन गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केले.

येत्या हंगामात अनधिकृत एचटीबीटी लागवड करणाऱ्या शेतकऱ्यांना संरक्षण देण्यात यावे, त्यांच्यावर कारवाई करू नये. तसेच एचटीबीटीला मान्यता मिळावी याकरिता राज्य सरकारने केंद्राकडे पाठपुरावा करावा, अशा विविध मागण्यांबाबत गृहमंत्री अनिल देशमुख आणि शेतकरी संघटनेच्या प्रतिनिधींमध्ये बैठक झाली. यावेळी विदर्भ राज्य जनआंदोलन समितीचे नेते रामभाऊ नेवले, डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. सी.डी. मायी, युवा आघाडीचे सतीश दाणी, सतीश देशमुख, मधुसुदन हरणे, ललित बहाळे, राजेंद्र झोटिंग, लक्ष्मीकांत कौठकर उपस्थित होते.

डॉ. मायी यांनी तंत्रज्ञानाची शेतीक्षेत्रातील गरज याविषयीची मांडणी केली. ॲड. वामनराव चटप यांनी लोकसभेत जीएम पिकासंदर्भाने झालेल्या प्रश्‍नोत्तरातील माहितीचे सादरीकरण केले. केंद्रीय पर्यावरणमंत्री बाबुल सुप्रियो यांनी जीएम बियाणे शरीराला घातक नसल्याचे त्यावेळी सांगितले होते. तेव्हा राज्य सरकारने स्थानिक पातळीवर चाचणी घेत नव्या तंत्रज्ञानाच्या पाठीशी राहावे, अशी मागणी ॲड. चटप यांनी केली.

राम नेवले यांनी एचटीबीटीवर बंधने असल्यामुळे शेतकरी ते अनधिकृतपणे खरेदी करतो. यामध्ये त्यांची फसवणूक होण्याची शक्‍यता असते. राज्य सरकारने केंद्रावर दबाव आणत हे तंत्रज्ञान खुले करावे. जगात जीएम तंत्रज्ञानामुळे सोयाबीनचे उत्पादन वाढले आहे. जगाच्या स्पर्धेत टिकायचे असल्यास आपल्यालाही या तंत्रज्ञानाच्या माध्यमातून उत्पादन वाढीचा विचार करावाच लागेल, असे सांगितले.

गृहमंत्री अनिल देशमुख यांनी याप्रश्‍नी केंद्र सरकारकडे पाठपुरावा करण्याचे आश्‍वासन यावेळी दिले. कृषिमंत्री दादा भुसे यांच्यासोबतही या विषयावर बैठकीबाबत निर्णय घेतला जाईल. हा विषय कृषी क्षेत्राशी निगडीत असल्याने कृषी मंत्रालयच याविषयावर भूमिका घेऊ शकते. त्यामुळे त्या पातळीवर चर्चेची गरज गृहमंत्र्यांनी यावेळी मांडली.  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com