पुणे ः सध्या सर्वत्र कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन सुरु आहे. या कालावधीत जीवनावश्यक वस्तूंच्या तुटवडा निर्माण होऊ नये म्हणून शासनाने बाजार समित्या सुरु ठेवण्याचे आदेश दिल आहेत. त्यानुसार गुरुवारपासून (ता.२६) शिरूर मुख्ययार्ड येथे शेतकरी बाजार (भाजीपाला बाजार) पूर्ववत भरविण्यात येत आहे. मात्र, नागरिक विनाकारण गर्दी करत आहे. त्यामुळे व्यापाऱ्यांनी योग्य ती काळजी घेऊन बाजार समितीच्या सूचनांचे पालन केले नाही तर पाच हजार रूपयापर्यंत दंड आकारला जाईल, असे निर्देश देण्यात आले आहेत.
लॉकडाऊनमुळे नागरिक किराणा माल व भाजीपाला खरेदीसाठी मोठ्या प्रमाणात गर्दी करत आहेत. ही गर्दी कमी करून कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी केंद्र व राज्य सरकारकडून विविध उपाययोजना आखल्या जात आहेत. यामध्ये पुणे जिल्ह्यातील नागरिकांना दररोज ताजा भाजीपाला पुरविण्यासाठी बाजार समित्या चालू ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. परंतु सध्या अनेक ग्राहक बाजार समितीत भाजीपाला, फळे घेण्यासाठी गर्दी करीत आहेत. त्यामुळे ही गर्दी कमी करण्याच्या उद्देशाने बाजार समितीने पुढाकार घेत आवश्यक ती काळजी घेण्याच्या सुचना व्यापाऱ्यांना व ग्राहकांना दिल्या आहेत.
सध्या शिरूर बाजार समितीअंतर्गत पिंपळे जगताप आणि तळेगाव ढमढेरे अशा दोन ठिकाणी उपबाजार भरविले जातात. शिरूर येथील मुख्य बाजारात १५ ते १६ व्यापारी असून येथे भाजीपाला खरेदीसाठी नागरिकांनी गर्दी करू नये. येथे सर्व शेतकरी, शेतकरी गट, शेतकरी कंपन्यांनी आपला शेतीमाल विक्रीसाठी आणावा, असे आवाहन बाजार समितीच्या सुत्रांकडून करण्यात आले आहे. व्यापारी, शेतकरी, ग्राहकांनी अशी काळजी घ्यावी
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.