जयपूरमध्ये वीज पडून लाखो रुपयांच्या कांद्याचे नुकसान

नाशिक : पूर्वमोसमी पाऊस सुरू झाल्यानंतर बागलाण तालुक्यातील जयपूर (मेंढीपाडा) येथे उसाच्या झापावर वीज पडून आग लागली. ही आग पसरून शेजारच्या कांदा चाळीनेही पेट घेतला. या आगीत साठवलेल्या शेकडो क्विंटल कांद्यासह शेतीउपयोगी व संसारपयोगी साहित्य जळून खाक झाले.
आगीत कांद्याचे मोठे नुकसान झाले
आगीत कांद्याचे मोठे नुकसान झाले

नाशिक : पूर्वमोसमी पाऊस सुरू झाल्यानंतर बागलाण तालुक्यातील जयपूर (मेंढीपाडा) येथे उसाच्या झापावर वीज पडून आग लागली. ही आग पसरून शेजारच्या कांदा चाळीनेही पेट घेतला. या आगीत साठवलेल्या शेकडो क्विंटल कांद्यासह शेतीउपयोगी व संसारपयोगी साहित्य जळून खाक झाले. त्यामुळे शेतकऱ्याचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.

सोमवारी (ता.१) सायंकाळी पाचच्या सुमारास विजांच्या कडकडाटासह जयखेडा परिसरात पावसाची सुरुवात झाली. यावेळी जयपूर येथे गट क्र.१६२ येथे शेतकरी रणजित सूर्यवंशी यांच्या उसाच्या पाचटाच्या झापावर वीज पडून आग लागली. ही आग इतकी भीषण होती की, यामुळे शेजारी असलेल्या कांदा चाळीनेही पेट घेतला. त्यामुळे आगीच्या तांडवात चाळीत असलेला ३०० क्विंटल कांदा यात जळून खाक झाला. एकीकडे नैसर्गिक आपत्ती अन् आता ‘कोरोना’चे संकट असताना ऐन खरिपाच्या तोंडावर शेतीपयोगी व काही संसारपयोगी साहित्यही जळाले आहे. त्यामुळे मोठी अडचण या शेतकऱ्यासमोर उभी राहिली आहे.

वीज पडून आग लागल्यानंतर शेजारील शेतकऱ्यांना समजताच त्यांनी धाव घेत आग विझवून ती रात्री उशिरापर्यंत नियंत्रणात आली. सूर्यवंशी यांच्या चाळीला लागून इतर शेतकऱ्यांच्या चाळी होत्या. जर ही आग वाढली असती, तर मोठे आर्थिक नुकसान झाले असते. वेळीच आग आटोक्यात आल्याने मोठा अनर्थ टळला, असे स्थानिकांनी सांगितले.  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com