शेतीमाल विषाणूमुक्त असल्याचे प्रमाणपत्र सादर करण्याचे व्यापाऱ्यांना आदेश

कोरोनाच्या विषाणूबाबत जी भीती आहे त्यापोटी आम्ही परिपत्रक काढले आहे. याबाबत आम्ही अन्न व औषध प्रशासनासोबत चर्चा करून संभ्रमवास्था दुर करू. - बाबा बिबवे, फळे भाजीपाला विभागप्रमुख.
संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

पुणे  ः कोरोना विषाणूबाबत देशात भीतीचे वातावरण असताना, पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये चीनमधून फळांची आवक होत नसताना देखील, परदेशी फळे विषाणूमुक्त असल्याचे प्रमाणपत्र सादर करण्याचे आदेश बाजार समिती प्रशासनाने व्यापाऱ्यांना दिले आहेत. त्यामुळे फळ व्यापाऱ्यांमध्ये नाराजी असून, वेठीस धरण्याचा हा प्रकार असल्याचे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे. मात्र विषाणूमुक्त प्रमाणपत्रासाठी फळे, भाजापीला तपासणी आणि प्रमाणपत्र देण्याचे अधिकार नसल्याचे समोर येत आहे. 

कोरोना विषाणूबाबत देशभरात जनजागृती केली जात आहे. बाजार समित्यांमध्ये परदेशातून आवक होणारी फळे विषाणूमुक्त असल्याचे प्रमाणपत्र असल्याशिवाय फळे विक्री करू नये, असे आदेश बाजार समिती प्रशासनाने फळ विक्रेत्यांना दिले आहेत. मात्र ही फळांची तपासणी कुठे करायची, प्रमाणपत्र कोणाकडून घ्यायचे याबाबतचे मार्गदर्शन न करता केवळ आदेश देण्यात आले. एकतर चीनमधून कोणत्याही फळांची आवक होत नाही. तशी नोंदही बाजार समितीकडे नाही. तरीही विषाणुमुक्त प्रमाणपत्राची अट कशासाठी असा प्रश्‍न व्यापाऱ्यांनी केला आहे.  

कोणत्याही देशातून फळे, भाजीपाल्याची आयात करताना निर्यातदार आणि आयातदार देश त्याची तपासणी करुनच आयात - निर्यात करतात. या फळांच्या तपासणी यंत्रणा केंद्रीय पातळीवर असतात. स्थानिक पातळीवर फळांच्या चाचण्या करण्याचे अधिकार नसल्याचे पणन मंडळ आणि अन्न व औषध प्रशासनाकडून सांगण्यात आले.   

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com