युरियाबाबत राज्य सरकारचा गलथान कारभार : आमदार रणधीर सावरकर

अकोला ःकेंद्राने वेगवेगळ्या कंपन्यांचा युरिया महाराष्ट्राला पाठवलेला असतानासुद्धा राज्य शासनाच्या गलथान कारभारामुळे शेतकरी, शेतमजूर हवालदिल झाला आहे, असा आरोप भाजपचे आमदार तथा जिल्हाध्यक्ष रणधीर सावरकर यांनी केला.
आमदार रणधीर सावरकर
आमदार रणधीर सावरकर

अकोला  ः केंद्र सरकारने शेतकऱ्यांसाठी वेळेपूर्वीच युरियाचा मुबलक साठा राज्य शासनाला उपलब्ध करून दिला आहे. केंद्राने वेगवेगळ्या कंपन्यांचा युरिया महाराष्ट्राला पाठवलेला असतानासुद्धा राज्य शासनाच्या गलथान कारभारामुळे शेतकरी, शेतमजूर हवालदिल झाला आहे, असा आरोप भाजपचे आमदार तथा जिल्हाध्यक्ष रणधीर सावरकर यांनी केला. 

या विषयावर सरकारने लक्ष केंद्रित न केल्यास भाजप रस्त्यावर उतरेल,  असा इशाराही त्यांनी दिला. आमदार सावरकर म्हणाले, की केंद्र सरकार शेतकऱ्यांविषयी संवेदनशील आहे. केंद्रीय राज्यमंत्री संजय धोत्रे यांनी केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्रसिंह तोमर यांच्याशी संपर्क साधून वेगवेगळ्या कंपन्यांचा  युरिया उपलब्ध करून दिला. परंतु, काँग्रेस, शिवसेना, राष्ट्रवादीचे सरकार योग्य नियोजन करीत नसल्यामुळे शेतकऱ्यांना युरियासाठी दुकानांसमोर रांगा लावाव्या लागत आहे.

‘कोरोना’च्या काळात शेतकऱ्यांना त्रास देण्याचे काम महाआघाडी सरकार करीत आहे. युरियाबाबत सरकारने दोन दिवसांत नियोजन केले नाही तर भाजप आंदोलन करेल, असा इशारा आमदार सावरकर यांनी दिला.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com