शेतकरी संघटना करणार बळिराजा पक्ष स्थापन

शेतकरी संघटना करणार बळिराजा पक्ष स्थापन
शेतकरी संघटना करणार बळिराजा पक्ष स्थापन

नगर  ः शेतकरी संघटनेच्या चळवळीने ४० वर्षांत काँग्रेस- भाजपचे राजकारण पाहिले आहे. दोन्ही पक्षांच्या आघाड्या शेतकरी विरोधी आहेत. त्यामुळे शेतकरी संघटनाच आता अधिक ताकदीने राजकारणात उतरणार आहेत. त्यासाठी शेतकरी संघटना बळिराजा हा राजकीय पक्ष स्थापन करणार असून, बुधवारी (ता. १५) त्याची औरंगाबाद येथे अधिकृत घोषणा आणि ध्येय धोरणे जाहीर करेल. स्व. शरद जोशी यांच्या राजकीय धोरणानुसारच शेतकरी संघटनेचा पक्ष काम करणार आहे. यापुढील सर्व निवडणुकाही ताकदीने लढवल्या जाणार आहेत, अशी माहिती शेतकरी संघटनेचे अध्यक्ष रघुनाथदादा पाटील यांनी दिली. 

नगर येथे श्री. पाटील यांनी ही माहिती दिली. या वेळी संघटनेचे विभागीय अध्यक्ष बाळासाहेब पटारे, युवा आघाडीचे प्रदेशाध्यक्ष हनुमंत वीर, जिल्हाध्यक्ष बच्चू मोढवे, पद्माकर कोरडे आदी उपस्थित होते. या वेळी ते म्हणाले, की औरंगाबाद येथे संघटनेचे नेते स्व. बबनराव काळे यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ संघटनेची राज्य कार्यकारिणी बैठक होत आहे. शेतकऱ्यांमध्ये जागृती करण्यासाठी आणि तरुणांची फळी उभी करण्यासाठी राजकीय पक्ष स्थापन केला जात असून, ताकदीने लढा उभारला जाणार आहे.

‘कर्जमाफी करताना सातबारा पाहायचा होता’ रघुनाथदादा पाटील म्हणाले, की मागील आणि या सरकारने कर्जमाफी करण्याचे दाखवलेले आमिष खोटे आहे. सातबारा कोरा करणार म्हणाले होते. मग कर्जमाफी करताना किमान शेतकऱ्यांचा सातबारा पाहून त्यावर किती कर्ज आहे हे तरी पाहायचे होते; पण मुळात शेतकरी विरोधी धोरणांची अंमलबजावणी करणारे शेतकऱ्यांचे नुकसानच करत आहेत.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com