ऊसतोड मजुरांना गावी जाता येणार; मात्र...

नगर ः साखर कारखान्यांचा गाळप हंगाम संपूनही लॉकडाउन असल्याने पंधरा दिवसांपासून अडकून पडलेल्या ऊसतोड कामगारांना आता घरी जाता येणार आहे. राज्याच्या मुख्य सचिवांनी शुक्रवारी (ता.१७) याबाबत आदेश काढले आहेत. त्यामुळे अडकून पडलेल्या मजुरांना घरी जाण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. मात्र, कारखाना कार्यस्थळ सोडण्याआधी आरोग्य तपासणी करावी, तसेच कामगारांची यादी तयार करून ती यादी संबंधित जिल्हाधिकाऱ्यांकडे मान्यतेसाठी दिली जावी, असे आदेशांत नमूद केले आहे.
संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

नगर  ः साखर कारखान्यांचा गाळप हंगाम संपूनही लॉकडाउन असल्याने पंधरा दिवसांपासून अडकून पडलेल्या ऊसतोड कामगारांना आता घरी जाता येणार आहे. राज्याच्या मुख्य सचिवांनी शुक्रवारी (ता.१७) याबाबत आदेश काढले आहेत. त्यामुळे अडकून पडलेल्या मजुरांना घरी जाण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. मात्र, कारखाना कार्यस्थळ सोडण्याआधी आरोग्य तपासणी करावी, तसेच कामगारांची यादी तयार करून ती यादी संबंधित जिल्हाधिकाऱ्यांकडे मान्यतेसाठी दिली जावी, असे आदेशांत नमूद केले आहे. साखर कारखान्यांचा गाळप हंगाम संपला आणि गावाकडे जायची तयारी करीत असतानाच ‘कोरोना’ पार्श्वभूमीवर लॉकडाउन सुरु झाल्याने ऊसतोड मजूर कारखान्यांवरच अडकून पडले होते. शासनाने दिलेल्या माहितीनुसार सध्या ३८ कारखान्यांवर १ लाख ३१ हजार ५०० मजूर अडकलेले आहेत. यांपैकी बहुतांश मजूर बीड जिल्ह्यातील असल्याने मजुरांना गावी जाण्यासाठी परवानगी द्यावी, अशी मागणी सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे, माजी ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांच्यासह नेत्यांनी केली. त्यातच दोन दिवसांपूर्वी झालेल्या पावसाने कारखाना कार्यस्थळावरील मजुरांचे हाल झाले. त्यामुळे चौदा दिवसांचा कालावधी पूर्ण झालेल्या मजुरांना गावी जाता यावे याबाबत शुक्रवारी आदेश काढण्यात आले.

मात्र गावी जाण्याआधी चौदा दिवसांचा कालावधी पूर्ण झाला आहे अशा मजुरांची आरोग्य तपासणी होणार आहे. त्यांच्यात न्यूमोनिया, सर्दी, ताप, खोकला यासारखी कोणतीही लक्षणे नाहीत याचे प्रमाणपत्र घेऊन गावनिहाय, तालुकानिहाय संपर्कासह यादी तयार करावी. त्यात संबंधित मजुरांच्या गावच्या सरपंचाचेही नाव असावे. कामगार सध्या ज्या जिल्ह्यात वास्तव्याला आहेत, त्या जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्यांकडे ही यादी मान्यतेसाठी पाठवावी. तीच यादी जेथे जाणार आहेत त्या जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी, तहसीलदारांना द्यावी अशी सर्व जबाबदारी साखर कारखान्याच्या व्यवस्थापकीय संचालकांवर असेल.

मजूर गावी गेल्यावर त्यांना गाव प्रवेशाची जबाबदारी तेथील सरपंचावर देण्यात आली आहे. शिवाय मजूर गावी सुरक्षित पोहोचल्याचा अहवाल साखर आयुक्तांना द्यावा, असे आदेशात नमुद केले आहे.  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com