शेतकरी अपघात विमा योजनेत कुटुंबातील दोघांना मिळणार लाभ

एका शेतकरी कुटुंबातील १० ते ७५ वयोगटांतील दोघांना या योजनेतून मदत मिळणार आहे. विम्याची जबाबदारी दि युनिव्हर्सल सोम्पो जनरल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड पुणे या कंपनीकडे आहे. अपघात होताच शेतकऱ्याच्या कुटुंबाने कृषी विभागाशी संपर्क साधावा. - रवींद्र माने, प्रभारी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, सोलापूर.
संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

सोलापूर ः शासनाने शेतकऱ्यांसाठी गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना लागू केली आहे. या योजनेत खातेदार शेतकऱ्यांसह त्याच्या कुटुंबातील अन्य एका व्यक्तीलाही या अपघात विमा योजनेचा लाभ मिळणार असल्याची माहिती प्रभारी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी रवींद्र माने यांनी दिली. या अपघात विमा योजनेत शेतकऱ्याच्या कुटुंबास दोन लाखांची मदत दिली जाते. 

या योजनेत यापूर्वी केवळ खातेदार शेतकऱ्याचाच समावेश होता. मात्र त्यामध्ये शासनाने दुरुस्ती करून शेतकऱ्यांसह त्याच्या कुटुंबातील एका व्यक्तीलाही याचा लाभ होणार असल्याचे जाहीर केले आहे. शेतकऱ्यांना रात्री-अपरात्री शेतामध्ये काम करत असताना अपघात होऊन मृत्यू झाल्यास त्या शेतकऱ्याच्या कुटुंबास दोन लाख रुपयांपर्यंतची मदत शासनाकडून दिली जाते. शेती व्यवसाय करताना होणारे अपघात, वीज पडणे, पूर, सर्पदंश, विंचू दंश, विजेचा शॉक बसणे इत्यादी नैसर्गिक आपत्तीमुळे होणाऱ्या अपघातांचा या योजनेमध्ये समावेश आहे.

याशिवाय रस्त्यावरील अपघात, वाहन अपघात किंवा अन्य कोणत्याही कारणामुळे शेतकऱ्यांचा अपघात झाल्यास त्याच्या कुटुंबाला ही मदत मिळते. शेतकऱ्याशिवाय त्याच्या कुटुंबातील पत्नी, मुलगा, अविवाहित मुलगी यांचाही अपघाती मृत्यू झाल्यास त्यांच्या कुटुंबाला मदत मिळते.   

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com