टोळधाडीच्या अस्तित्वाने विदर्भात पसरली अस्वस्थता

नागपूर ः टोळधाड मध्यप्रदेशात परतल्याचे सांगितले जात असतानाच अमरावती आणि नागपूर जिल्ह्यात पुन्हा टोळधाडीचे अस्तित्व दिसून आल्याने शेतकऱ्यांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे. मोर्शी, वरुड तालुक्‍यातील अनेक शेतकऱ्यांनी त्यांच्या बागेतील संत्रा पिकाचे आणि भाजीपाला पिकांचे नुकसान झाल्याची माहिती दिली. त्यामुळे दोन्ही जिल्ह्यात अत्यल्प नुकसानीचा कृषी विभागाचा दावा फोल ठरला आहे.
संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

नागपूर   ः टोळधाड मध्यप्रदेशात परतल्याचे सांगितले जात असतानाच अमरावती आणि नागपूर जिल्ह्यात पुन्हा टोळधाडीचे अस्तित्व दिसून आल्याने शेतकऱ्यांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे. मोर्शी, वरुड तालुक्‍यातील अनेक शेतकऱ्यांनी त्यांच्या बागेतील संत्रा पिकाचे आणि भाजीपाला पिकांचे नुकसान झाल्याची माहिती दिली. त्यामुळे दोन्ही जिल्ह्यात अत्यल्प नुकसानीचा कृषी विभागाचा दावा फोल ठरला आहे.

अमरावती आणि नागपूर जिल्ह्यात टोळधाडीने गेल्या रविवारपासून (ता.२४) संत्रा, भाजीपाला पिकावर हल्लाबोल केला. गेल्या आठवडाभरापासून अमरावती, नागपूर नंतर भंडारा जिल्ह्यातही टोळधाडीची दहशत अनुभवली गेली. कृषी विभागाने प्रतिबंधात्मक उपाययोजनांव्दारे कीड नियंत्रण सुरु केले आहे. परंतु त्यास अपेक्षित यश मिळाले नसल्याचे किडीचे या भागात कायम असलेल्या अस्तित्वावरून सिद्ध होत आहे. अमरावती जिल्ह्यातून टोळधाड मध्यप्रदेशात परतल्याचा दावा कृषी विभागाने केला होता.

मात्र गुरुवारी (ता.२८) मध्यरात्री मोरांगणा, राजूरा बाजार या भागातील एका पुलाखाली, रस्त्यालगत ही कीड पुन्हा दिसून आली. तब्बल चार किलोमीटर अंतर लांब ही झुंड होती. रस्त्यालगतच्या झुडपी वनस्पतींची पाने या किडीने फस्त केली. कृषी विभागाने आपल्या अहवालात नागपूर आणि अमरावती जिल्हयात अवघे ५० हेक्‍टरचे नुकसान झाल्याचा दावा केला आहे. परंतु संत्री, मोसंबी बागायतदार तसेच भाजीपाला उत्पादकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचे शेतकरी सांगत आहेत. मोर्शी परिसरातील नवीन पेठे यांच्यासह अनेक शेतकऱ्यांनी दूरध्वनीव्दारे ही माहिती दिली.

नागपूर जिल्ह्यात जलालखेडा, रामटेक परिसरात ही कीड सध्या आहे. खरीप हंगाम अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. या किडीची दहशत अशीच कायम राहिल्यास शेतकऱ्यांचा हंगाम धोक्‍यात येण्याची शक्‍यता वर्तविली जात आहे.

ड्रोनव्दारे होणार कीटकनाशक फवारणी रात्रीच्यावेळी टोळधाड उंच झाडावर थांबते. अग्निशमन यंत्रणा त्यावर फवारणीस बऱ्याचअंशी प्रभावी ठरते. त्यासोबतच येत्या काळात ड्रोनव्दारे फवारणीचा पर्याय अवलंबिण्यात यावा, अशी सूचना शुक्रवारी (ता.२९) कृषिमंत्री दादा भुसे यांनी कृषी विभागाला केली आहे. परंतू कृषी विद्यापीठासह कोणत्याच कृषी यंत्रणेकडे याविषयी माहितीच नसल्याचे वास्तव या दरम्यान समोर आले आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com