भाटघर, वीर, नीरा देवघर धरणांतील पाणीसाठ्यात वाढ

सोलापूर :सोलापूर, पुणे आणि सातारा जिल्ह्यासाठी महत्वाच्या असलेल्या भाटघर, वीर, नीरा देवघर या धरणांच्या पाणलोट क्षेत्रात होत असलेल्या पावसामुळे या धरणांतील पाणीसाठ्यात हळूहळू वाढ होत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना यंदा चांगला दिलासा मिळाला आहे.
संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

सोलापूर  : सोलापूर, पुणे आणि सातारा जिल्ह्यासाठी महत्वाच्या असलेल्या भाटघर, वीर, नीरा देवघर या धरणांच्या पाणलोट क्षेत्रात होत असलेल्या पावसामुळे या धरणांतील पाणीसाठ्यात हळूहळू वाढ होत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना यंदा चांगला दिलासा मिळाला आहे.

यंदा मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापासूनच पावसाने हजेरी लावल्याने धरणांमधील पाणीसाठयात वाढ होऊ लागली आहे. शिवाय गेल्यावर्षीही धरणे भरल्यामुळे यंदा उन्हाळा जाणवला नाही. या वर्षी जून महिन्यात चांगला पाऊस झाला आहे. त्यात यंदा धरण परिसरात कमी पाऊस आहे, परंतु पाणलोट क्षेत्रात मात्र चांगला पाऊस पडत असल्यामुळे पाणीसाठ्यात वाढ होत आहे. सध्या नीरा उजवा कालव्यातून आवर्तन सुरु आहे. त्यातून पिकांचे सिंचनाचे पाणी बंद करून ते माळशिरस तालुक्‍यातील निमगाव, उघडेवाडी, फोंडशिरस, गिरझणी तलावात सोडले जात असल्याने उघडेवाडी व गिरझणी तलाव भरले आहेत.

पाऊस असा सतत वाढल्यास लवकरच पाणीसाठा आणखी वाढण्याची शक्यता आहे. सध्या भाटघर धरणामध्ये ३०.१२ टक्के, वीरमध्ये ३८.६९ टक्के आणि नीरा-देवघरमध्ये १४.३९ टक्के पाणीसाठा आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com