मुळा, भंडारदरा धरणांतून आजपासून आवर्तन

संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

नगर  ः यंदा पाऊस चांगला झाल्याने धरणक्षेत्रात मुबलक पाणीसाठा उपलब्ध आहे. बहुतांश ठिकाणी पिकांना पाण्याची आवश्‍यकता आहे. त्यामुळे जिल्ह्यातील मुळा, भंडारदरा या धरणांतील पहिले आवर्तन आजपासून (बुधवारी, ता. २२) सुरू करा, असे आदेश जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत संबंधित यंत्रणेला दिले. 

नगर येथे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन समिती सभागृहात सोमवारी पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या अध्यक्षतेखाली कालवा सल्लागार समितीची बैठक पार पडली. जलसंधारणमंत्री शंकरराव गडाख, नगरविकास राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे, आमदार रोहित पवार, संग्राम जगताप, मोनिका राजळे, जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष राजश्री घुले, जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी, मुख्यकार्यकारी अधिकारी शिवराज पाटील, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी जगन्नाथ भोर यांच्यासह अधिकारी या वेळी उपस्थित होते. 

गोदावरी व कृष्णा खोऱ्यापैकी गोदावरी खोऱ्यातील मुळा, भंडारदरा, निळवंडे प्रकल्पांतील यंदाच्या उपलब्ध पाण्याची स्थिती अधिकाऱ्यांनी सांगितली. तसेच २४ जानेवारीपासून रब्बीसाठी आवर्तन सोडणार असल्याचे स्पष्ट केले. दरम्यान, आमदारांनी त्याआधी आवर्तन सुरू करण्याची मागणी केली. त्यानंतर मुश्रीफ यांनी बुधवारपासून (ता. २२) आवर्तन सुरू करण्याचे आदेश दिले.

‘चाऱ्या दुरुस्त न करणाऱ्या पाणीवापर संस्थांवर कारवाई करा’ दोन्ही धरणांच्या लाभक्षेत्रात अनेक ठिकाणी चाऱ्यांची दुरवस्था झाली असल्याचा प्रश्न उपस्थित करण्यात आला. पाणी वापर संस्थांची चाऱ्या दुरुस्ती करण्याची जबाबदारी आहे. त्यासबंधी पाणीवापर संस्थांची बैठक घ्या. त्यात चर्चा करा व ज्या संस्था चाऱ्या दुरुस्त करणार नाहीत. त्यांच्यावर काय कारवाई करता येईल, असेही बैठकीत सांगण्यात आले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com