जावळी तालुक्यात वन्यप्राण्यांकडून काढणीला आलेली पिके फस्त

शेतकरी पिकाच्या राखणीसाठी सकाळी, दुपारी आणि रात्रीही शेताच्या बांधावरच थांबत आहेत. दिवसा ऐन उन्हात पशुपक्षी यांच्यापासून राखण, रात्री रानडुकरांचा कळप येतो. त्यावेळी फटाके किंवा डबडी वाजवून पिकाची राखण करावी लागते. तरीही रानडुकरांमुळे नुकसान होते. -अनिल धनावडे, शेतकरी
वन्य प्राण्यांकडून पिकांचे नुकसान
वन्य प्राण्यांकडून पिकांचे नुकसान

  मेढा, जि. सातारा : जावळी तालुक्‍यात रानडुकरांमुळे ज्वारी, भुईमूग, हरभरा, फराशी आदी पिकांचे नुकसान झाले आहे. काढणीस आलेली पिके वन्य प्राणी रात्री फस्त करत असल्यामुळे शेतकरी हवालदिल झाले आहेत. वन विभागाने लक्ष देण्याची गरज निर्माण झाली आहे.  दिवसा पक्षी, तर रात्री वन्यप्राणी शेतातील उभ्या पिकांचे मोठे नुकसान करत आहेत. त्यामुळे जावळीतील शेतकरी त्रस्त झाले असून, दिवसा शेताच्या राखणीमुळे काम करता येईना, रात्रभर शेतात जावून ऐन थंडीत पहारा द्यावा लागत असल्यामुळे झोप मिळेना, अशी दैना शेतकऱ्यांची झाली आहे. वन्य प्राण्यांचा बंदोबस्त वन विभगाने करावा, अशी मागणी जोर धरत आहे. वन विभागाकडून नुकसानीचे पंचनामे वेळेत होत नाहीत. पंचनामे झाले तर मदत तुटपुंजी मिळते. मोठ्या शेतातून रानडुक्कर फिरलेल्या पिकांची मदतही मिळत नाही. नुकसानीची मदत मिळते, असे म्हणणारे अधिकारी नुकसानीची पाहणी करताना टेप टाकून मापे घेतात.

त्यामुळे रानडुक्कर फिरलेल्या पिकांची मदतही मिळत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे.  रानडुकरांमुळे ज्वारी, भुईमूग, हरभरा, फराशी आदी पिकांचे नुकसान होत आहे. काढणीस आलेली शिवारे रानडुकरे फस्त करीत असल्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे. वन विभागाने दक्षता घेण्याची शेतकऱ्यांची मागणी आहे.   

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com