भाजपचे राज्यात २५ ला धरणे आंदोलन : प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील

प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील
प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील

मुंबई : भारतीय जनता पक्ष येत्या मंगळवारी (ता. २५) राज्यव्यापी धरणे  आंदोलन करणार आहे. याबाबत भाजपचे प्रदेशाध्यक्ष  चंद्रकांत पाटील यांनी माध्यमांना माहिती दिली.

राज्यभरात तब्बल ४०० ठिकाणी भाजपकडून धरणे आंदोलन करण्यात येणार आहे. राज्यात महाविकास आघाडीचे सरकार शेतकऱ्यांकडे आणि सामान्य जनतेकडे दुर्लक्ष करतेय. ठाकरे सरकार नागरिकत्व सुधारणा कायदा आणि एनपीआरला विरोध करतेय, असा आरोप भाजपकडून केला जातोय. याच पार्श्वभूमीवर भाजप धरणे आंदोलन करणार आहे.

भाजप संपूर्ण राज्यभरात ४०० ठिकाणी आंदोलन करणार आहे. आम्ही महाविकास आघाडीच्या अपयशाबद्दल जनतेला सांगणार आहोत. तसेच ठाकरे सरकार शेतकऱ्यांची कर्जमाफी आणि त्यांचे प्रश्न सोडवण्यात अपयशी ठरली आहे. हे सरकार नागरिकत्व सुधारणा कायदा आणि एनपीआरला विरोध करत आहे म्हणूनच आम्ही संपूर्ण राज्यभरात धरणे आंदोलन करणार आहोत. आम्ही  आमची विचारधारा सोडलेली नाही. महाविकास आघाडीचे सरकार हे त्यांच्यातील मतभेदांमुळेच पडणार आहे, असेही श्री. पाटील यांनी सांगितले. महाविकास आघाडीचे सरकार अवास्तविक आहे. तसेच, यापुढे भाजप सर्व निवडणुका स्वत:च्या भरवशावर लढवेल, असे भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांनी म्हटले आहे. 

दरम्यान, राजू शेट्टी यांनी चंद्रकांत पाटील यांच्या वक्तव्याचा समाचार घेतला.  भाजपचे सरकार स्वप्नातच  आहे आणि स्वप्नातच राहणार, उन्हाळा वाढला आहे म्हणून धरणे आंदोलनाला जाताना भाजप नेत्यांनी सोबत छत्री घेऊन यावे, असा टोला राजू शेट्टी यांनी भाजपला लगावला.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com