अकोला : जिल्ह्यात यंदाच्या खरीप हंगामात पंतप्रधान पीक विमा योजनेअंतर्गत दोन लाख ४ हजार शेतकऱ्यांनी पीकविमा अर्ज सादर केले आहेत.
या हंगामासाठी पीकविमा अर्ज दाखल करण्याकरिता ३१ जुलैपर्यंत मुदत देण्यात आली होती. त्यानुसार मुदतीत दोन लाखांवर शेतकऱ्यांनी अर्ज सादर केले. यामध्ये १ लाख ९२ हजार ७१५ बिगर कर्जदार शेतकऱ्यांचा तर ११ हजार ८६७ कर्जदार शेतकऱ्यांचा समावेश आहे. सुविधा केंद्रांच्या माध्यमातून १ लाख ९२ हजार ६१२ शेतकऱ्यांनी तर बँकांच्या माध्यमातून ११ हजार ९७० शेतकऱ्यांनी पीकविमा उतरविला आहे.
यात अकोला तालुक्यातील ४३ हजार ८४६, अकोट तालुक्यातील ३१ हजार ४५९, बाळापूर तालुक्यातील ३३ हजार ८६९, बार्शी टाकळी तालुक्यातील २३ हजार ४२६, मुर्तिजापूर तालुक्यातील ३१ हजार ३१५, पातूर तालुक्यातील १७ हजार ७२९, तेल्हारा तालुक्यातील २२ हजार ८९८ शेतकऱ्यांचा समावेश आहे.
पंतप्रधान पीकविमा योजनेतून जिल्ह्यातील १ लाख ६९ हजार ९२१ हेक्टर क्षेत्र संरक्षित करण्यात आले आहे. यामध्ये १३ कोटी ९८ लाख ८० हजार ७७७ रुपयांचा वाटा शेतकऱ्यांचा आहे. केंद्र व राज्य शासनाचा प्रत्येकी ४७ कोटी ३ लाख १७ हजार ५१३ रुपयांचा वाटा आहे. ६४० कोटी ६८ लाख १० हजार १५३ रुपयांचा एकूण पीक विमा उतरविण्यात आला आहे. बँकांनी ऑफलाइन पद्धतीने अर्ज स्वीकारले असून पुढील १५ दिवस त्यांना ही प्रक्रिया करण्यासाठी वेळ मिळाला आहे. अशी आहे स्थिती
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.