रत्नागिरीतील ७४८ शेतकरी पीकविमा योजनेत सहभागी

रत्नागिरी : खरीप हंगामाकरिता पंतप्रधान पीकविमा योजना लागू करण्यात आली आहे. रत्नागिरी जिल्ह्यात शुक्रवारी (ता.३१) शेवटच्या दिवशी दुपारपर्यंत जिल्ह्यातील ७४८ शेतकऱ्यांनी या योजनेतून पीकविमा उतरवला.
संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

रत्नागिरी  : खरीप हंगामाकरिता पंतप्रधान पीकविमा योजना लागू करण्यात आली आहे. रत्नागिरी जिल्ह्यात शुक्रवारी (ता.३१) शेवटच्या दिवशी दुपारपर्यंत जिल्ह्यातील ७४८ शेतकऱ्यांनी या योजनेतून पीकविमा उतरवला.गतवर्षीच्या तुलनेत या योजनेला यंदा कमी प्रतिसाद मिळाला आहे. जिल्ह्यातील कर्जदार शेतकऱ्यांनी पीकविमा उतरवण्याकडे पाठ फिरवल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.

यंदा शासनाने विमा योजनेच्या निकषांत बदल करून कर्जदार तसेच बिगर कर्जदार शेतकऱ्यांसाठी योजना ऐच्छिक ठेवण्याचा निर्णय घेतला. कर्जदार शेतकऱ्यांना या योजनेत सहभागी होण्याचा अथवा न होण्याचा पर्याय आहे. सहभागी न होण्याबाबत शेतकऱ्यांना अंतिम मुदतीच्या अगोदर सात दिवस घोषणापत्र द्यावे लागणार होते. रत्नागिरी जिल्ह्यासाठी पीक विम्याकरिता इफ्को टोकीओ जनरल इन्शुरन्स कंपनी लि. या कंपनीची नेमणूक केली आहे.

यंदा कर्जदार शेतकऱ्यांनी विमा उतरवण्याकडे काहीसे दुर्लक्ष केल्याचे दिसत आहे. गतवर्षी ऐन हंगामात झालेल्या अतिवृष्टीमुळे जिल्ह्यात खरीप पिकांचे मोठे नुकसान झाले होते. शासनाने सरसकट शेतकऱ्यांना विमा लाभ देण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे सुमारे १०४८ शेतकऱ्यांना २० लाख रुपये भरपाई मिळाली होती. हे लक्षात घेऊन यंदा पीक विमा योजनेत शेतकऱ्यांची संख्या वाढेल अशी शक्यता व्यक्त केली जात होती. परंतु, यंदा कमी प्रतिसाद मिळाला आहे. जिल्ह्यात शेवटच्या दिवशी दुपारपर्यंत ७४८ शेतकऱ्यांनी पीक विमा उतरवला आहे. यामध्ये ६० टक्के शेतकरी हे बिगर कर्जदार आहेत.  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com