मराठवाड्यातील ४८६ प्रकल्पांत ७५ टक्क्यांवर उपयुक्त पाणीसाठा

औरंगाबाद : मराठवाड्यातील ८७६ प्रकल्पांपैकी ४८६ मोठ्या मध्यम व लघू प्रकल्‍पांत ७५ टक्‍क्‍यांपेक्षा जास्त उपयुक्त पाणीसाठा झाला असल्याची माहिती जलसंपदा विभागाच्यावतीने देण्यात आली.
संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

औरंगाबाद : मराठवाड्यातील ८७६ प्रकल्पांपैकी ४८६ मोठ्या मध्यम व लघू प्रकल्‍पांत ७५ टक्‍क्‍यांपेक्षा जास्त उपयुक्त पाणीसाठा झाला असल्याची माहिती जलसंपदा विभागाच्यावतीने देण्यात आली. 

२५ सप्टेंबरअखेर मराठवाड्यातील मोठ्या,मध्यम, लघु प्रकल्पांसह तेरणा, मांजरा, रेणा व गोदावरी नदीवरील बंधारे मिळून ८७६ प्रकल्पांत  ८४.४३ टक्के उपयुक्त पाणीसाठा झाला होता. त्यामध्ये ११ मोठ्या प्रकल्पात ९३.५८, ७५ मध्यम प्रकल्पात ८२.४५, लघु प्रकल्‍पांत ६२.४०, गोदावरी नदीवरील १३ बंधाऱ्यात ६०.८७ तर तेरणा, मांजरा व रेणा नदीवरील २५ बंधाऱ्यांमध्ये ८९.४१ टक्के उपयुक्त पाणीसाठा झाल्याची माहिती जलसंपदा विभागाच्यावतीने देण्यात आली.

मराठवाड्यातील ११ मोठ्या प्रकल्पांपैकी आठ प्रकल्पांत ७५ टक्क्यांपेक्षा जास्त उपयुक्त पाणीसाठा झाला होता. त्यामध्ये औरंगाबाद, बीड, हिंगोली जिल्ह्यातील प्रत्येकी एक, नांदेडमधील तीन व परभणीतील दोन प्रकल्पांचा समावेश आहे. ७५ मध्यम प्रकल्पांपैकी ५२ प्रकल्पांत ७५ टक्‍क्‍यांपेक्षा जास्त उपयुक्त पाणीसाठा झाला आहे. त्यामध्ये औरंगाबादमधील १५, जालन्यातील ७, बीडमधील ११,उस्मानाबाद मधील ८, नांदेडमधील ९ व परभणीतील दोन प्रकल्पांचा समावेश आहे.

७५ टक्क्यांपेक्षा जास्त उपयुक्त पाणीसाठा असलेल्या ४२६ लघु प्रकल्‍पांत औरंगाबादमधील ७४, जालन्यातील ३४,बीडमधील ७२,लातूरमधील ६४, उस्मानाबादमधील ७१, नांदेडमधील ६८, परभणीतील १८ व हिंगोलीतील २५ लघु प्रकल्पांचा समावेश आहे.

मराठवाड्यातील औरंगाबाद, लातूर व उस्मानाबादमधील प्रत्येकी दोन व बीड मधील पाच मिळून ११ लघु प्रकल्‍ंपात २५ सप्टेंबर अखेरपर्यंत पाणीसाठा उपलब्ध नव्हता. दुसरीकडे ३ मध्यम व ६२ लघु प्रकल्पातील पाणीसाठा जोत्याखालीच होता. जोत्याखाली पाणीसाठा असलेल्या मध्यम प्रकल्पात, बीडमधील दोन, लातूर मधील एक तसेच ६२ लघु प्रकल्‍पात औरंगाबादमधील चार, जालनामधील पाच, बीडमधील १५, लातूरमधील १३, नांदेडमधील दोन व उस्मानाबाद मधील सर्वाधिक २३ लघु प्रकल्पांचा समावेश असल्याची माहिती जलसंपदा विभागाच्या सूत्रांनी दिली.

४७मध्यम प्रकल्प तुडुंब मराठवाड्यातील जवळपास ४७ मध्यम प्रकल्प तुडुंब भरले आहेत. तुडुंब झालेल्‍या मध्यम प्रकल्पांमध्ये औरंगाबादमधील १४, जालन्यातील ६, बीडमधील १०, लातूरमधील दोन मध्यम प्रकल्पांचा समावेश असल्याची माहिती जलसंपदा विभागाच्या सूत्रांनी दिली.  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com