साताऱ्यात पीक विम्यासाठी अखेरच्या दिवशीही अडचणी

सातारा ः जिल्ह्यातील४० हजार शेतकऱ्यांनी पीक विमा योजनेचा लाभ घेतल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. ‘कोरोना’चा प्रादुर्भाव तसेच सर्व्हर बंद पडण्याचा कारणामुळे पीकविमा भरण्यासाठी शेतकऱ्यांना शेवटच्या दिवशीहीअडचणींचा सामना करावा लागला.
संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

सातारा  ः पंतप्रधान पीकविमा योजनेच्या पोर्टलवर गुरुवार अखेर (ता.३०) जिल्ह्यातील ४७०० शेतकऱ्यांनी विमा अर्ज दाखल केले. तसेच जिल्हा बँकेकडे सुमारे ३५ हजार शेतकऱ्यांनी पीक विम्यासाठी अर्ज दाखल केले. जिल्ह्यातील एकूण ४० हजार शेतकऱ्यांनी पीक विमा योजनेचा लाभ घेतल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. ‘कोरोना’चा प्रादुर्भाव तसेच सर्व्हर बंद पडण्याचा कारणामुळे शेतकऱ्यांना शेवटच्या दिवशीही (शुक्रवारी) पीकविमा भरण्यासाठी अडचणींचा सामना करावा लागला. त्यामुळे योजनेच्या मुदतीत वाढ करण्याची मागणी शेतकऱ्यांकडून केली जात आहे.  

जिल्ह्यात भात, ज्वारी, बाजरी, नाचणी, भुईमूग, सोयाबीन, मूग, उडीद व कांदा या पिकांचा पंतप्रधान पीकविमा योजनेत समावेश करण्यात आला. नैसर्गिक आपत्तीमुळे वारंवार पिकांचे नुकसान होत असल्याने शेतकऱ्यांचा पीकविमा घेण्याकडे कल वाढला होता. मात्र जिल्ह्यात ‘कोरोना’चे संकट असल्याने अनेक शेतकऱ्यांना पीकविमा भरता आला नव्हता. अंतिम मुदत जसजशी जवळ येऊ लागली तशी शेतकऱ्यांनी पीक विमा घेण्यासाठी लगबग सुरू केली. शुक्रवारी (ता.३१) योजनेत सहभागासाठी अंतिम मुदत असतानाही पीकविमा घेताना काही ठिकाणी सर्व्हेर डाऊन झाल्याच्या तक्रारी येत होत्या.   प्रतिबंधित क्षेत्रामुळे शेतकऱ्यांची अडचण जिल्ह्यात दिवसेंदिवस ‘कोरोना’चा प्रादुर्भाव वाढत आहे. जिल्ह्यातील सुमारे ४०० गावांत कोरोनाचा संसर्ग पोचला आहे. परिणामी या गावांत संसर्ग वाढू नये यासाठी प्रतिबंधित क्षेत्रे जाहीर करण्यात आली आहेत. तसेच ‘कोरोना’ची साखळी तुटावी यासाठी अनेक गावांतील सर्व व्यवहार बंद ठेवले जात आहे. याचा परिणाम पीक विमा योजनेवर झाला असल्याचे शेतकऱ्यांकडून सांगितले जात आहे.

प्रतिबंधित क्षेत्रातील शेतकऱ्यांना पीकविमा काढता आला नाही. त्याचबरोबर इतर गावांतही ‘कोरोना’मुळे जात येत नसल्यामुळे पीक विम्यापासून शेतकरी वंचित राहण्याची शक्यता व्यक्त केली जात आहेत. त्यामुळे या योजनेला मुदतवाढ देण्याची मागणी केली जात आहे.  

प्रतिक्रिया नैसर्गिक तसेच इतर संकटांमुळे पीकविमा घेणे शेतकऱ्यांसाठी गरजेचे आहेत. मात्र सध्या ‘कोरोना’च्या पार्श्वभूमीवर निर्माण झालेल्या स्थितीत शेतकऱ्यांना पीकविमा भरताना अडचणी येत आहे. शुक्रवारी (ता३१) देखील सर्व्हेर बंद पडण्याच्या घटना घडत होत्या. यामुळे पीकविमा भरण्यासाठी मुदतवाढ मिळावी. - प्रकाश नलवडे, प्रगतिशील शेतकरी, नागठाणे, जि. सातारा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com