मुंबई बाजार समिती निवडणूकीसाठी ५८ उमेदवार रिंगणात

बाजारसमितीतील एकूण १८ जागांसाठी १८१ उमेदवारांचे अर्ज दाखल झाले होते. त्यापैकी प्रत्यक्षात ५८ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात राहिले आहेत. येत्या २९ तारखेला मतदान पार पडणार आहे. - श्‍यामकांत साळुंखे, सहायक निवडणूक अधिकारी
संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

मुंबई  : मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीसाठी ५८ उमेदवार रिंगणात राहिले आहेत. शुक्रवारी (ता. १४) अर्ज मागे घेण्याच्या अखेरच्या दिवसापर्यंत १२३ उमेदवारांनी अर्ज मागे घेतले आहेत, त्यामुळे आता निवडणूक लागलेल्या विभागांमध्ये तिरंगी किंवा चौरंगी लढत होणार असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. 

बाजार समितीच्याअंतर्गत येणारे सहा महसूल विभाग, पाच बाजार आवार आणि व्यापारी, हमाल, माथाडी यांच्या प्रतिनिधींची ही निवडणूक होत आहे. यातील व्यापारी, हमाल, माथाडी या विभागातून आणि फळ बाजारातून प्रत्येकी एकेका उमेदवाराने अर्ज दाखल केला असल्याने या दोन गटांमधील निवडणूक बिनविरोध झाली आहे; मात्र सहा महसुली आणि चार बाजार आवारांत अटीतटीची लढत होणार असल्याची स्थिती आहे.  

कांदा-बटाटा बाजारात या वेळी अशोक वाळुंज, सुरेश शिंदे आणि राजेंद्र शेळके यांच्यात तिरंगी लढत होणार आहे. मसाला बाजारात विजय धुत, अशोक राणावत आणि कीर्ती राणा यांच्यात तिरंगी लढत होत आहे. अन्न-धान्य बाजारात नीलेश वीरा, पोपटलाल भंडारी आणि लक्ष्मीदास भानुशाली यांच्यातही तिरंगी लढत आहे. भाजीपाला बाजारात शंकर पिंगळे, के. डी. मोरे, प्रताप चव्हाण आणि अप्पासाहेब शिरकर यांच्यात लढत होईल. इतर सहा महसुली विभागांपैकी अमरावती विभागातून सात, नागपूर विभागातून सात, नाशिक विभागातून आठ, कोकण विभागातून पाच, औरंगाबाद विभागातून अकरा आणि पुणे महसुली विभागातून पाच उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत.   

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com