सातारा जिल्ह्यात आले लागवडीस प्रारंभ

सातारा :जिल्ह्यात आले लागवडीस प्रारंभ झाला आहे. भर उन्हात लागवड सुरू असून सरासरीपेक्षा जास्त म्हणजेत अडीच हजार हेक्टरवर लागवड होण्याचा अंदाज आहे. लॅाकडाउनमुळे आले पिकाचे दर निम्यावर आले असले तरी लागवडीच्या क्षेत्रात घट होणार नसल्याचे तज्ज्ञांनी सांगितले.
पाल येथील प्रगतशील शेतकरी संजय गोरे यांच्या शेतात सुरू असलेली आले लागवड.
पाल येथील प्रगतशील शेतकरी संजय गोरे यांच्या शेतात सुरू असलेली आले लागवड.

सातारा : जिल्ह्यात आले लागवडीस प्रारंभ झाला आहे. भर उन्हात लागवड सुरू असून सरासरीपेक्षा जास्त म्हणजेत अडीच हजार हेक्टरवर लागवड होण्याचा अंदाज आहे. लॅाकडाउनमुळे आले पिकाचे दर निम्यावर आले असले तरी लागवडीच्या क्षेत्रात घट होणार नसल्याचे तज्ज्ञांनी सांगितले.

सातारा जिल्ह्यात उस, हळद या नगदी पिकांच्या बरोबरीने आले लागवड होत असते. जिल्ह्यात आले पिकाचे सर्वसाधरण क्षेत्र अडीच हजार हेक्टर आहे. बेणे खरेदी मोठ्या प्रमाणात झाली असल्याने सर्वसाधारण क्षेत्रापेक्षा अधिक क्षेत्रावर लागवड होण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. कोरेगाव, सातारा, कराड, खटाव तालुक्यात सर्वाधिक प्रमाणात आले पिक घेतले जाते.

अक्षयतृतीया हा आले लागवडीचा मुहुर्त मानला जात असल्याने यावेळी लागवड करण्याची प्रथा आहे. मात्र या काळात उष्णतेत वाढ जास्त असल्याने आले खराब होण्याची शक्यता असल्याने शेतकऱ्यांनी लागवड टाळली. पाऊस झालेल्या ठिकाणी व पाण्याची उपलब्धतता असलेल्या ठिकाणी आले लागवडीस प्रारंभ झाला आहे. कमी अधिक प्रमाणावर लागवड सुरू आहे. मात्र सध्या ३८ अंश सेल्सिअसच्या वर तापमान असल्याने काही शेतकऱ्यांकडून पाणी देऊन लागवड केली जात आहे.

२२ ते २३ हजार प्रति गाडी (५०० किलो) प्रमाणे आले बेण्याचे दर होते. सध्या मात्र कोरोनामुळे आले पिकाच्या दरात घसरण होऊन ते निम्यावर आले आहे. कोरोना येण्यापूर्वी आल्याचे दर प्रतिगाडीस २२ ते २४ हजार रुपये होते. त्यानंतर कोरोनामुळे लॅाकडाऊन सुरू झाल्याने मुंबई, पुणे यासह देशातील प्रमुख बाजारपेठा बंद झाल्या आणि आले खरेदी विक्रीवर मर्यादा आल्या. याचा परिणाम दरावर झाला असून सध्या १२ ते १३ प्रतिगाडी म्हणजेच निम्म्यावर दर आले आहेत. नेहमी इतके दर राहतील या अंदाजावर बेणे खरेदी करून आडी लावण्यात आली आहेत. यामुळे आले पिकाच्या क्षेत्रावर परिणाम होणार नसल्याचे दिसून येत आहे.   कमी तापमानात लागवड करा सध्या ३८ ते ३९ अंश सेल्सिअस तापमान होत आहे. हे तापमान आले लागवडीच्या दृष्टीने घातक आहे. गतवर्षी तापमान वाढीत केलेल्या लागवडीवर वितरित परिणाम झाला होता. जमिनीत आले बियाणे गाबळल्याने उगवण झाली नव्हती. याचा अर्थिक फटका शेतकऱ्यांना सहन करावा लागला होता. आले लागवड ३३ अंश सेल्सिअस आत तापमान आल्यावर केली जावी असे तज्ज्ञांकडून सांगितले जात आहे. ज्या शेतकऱ्यांना लागवड केली आहे, त्यांनी जमिनीत ओलावा ठेवण्याचे आवाहन केले जात आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com