राजस्थानातील चुरूत ५० अंशांवर तापमान; महाराष्ट्रातही उष्णतेची लाट

पुणे :महाराष्ट्रासह, वायव्य आणि मध्य भारतातील राज्यांमध्ये उष्णतेची लाट आहे. बुधवारी (ता.२७) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये राजस्थानातील चुरू येथे देशातील उच्चांकी ५० अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे.
राजस्थानातील चुरू येथे तापमान ५० अशांवर गेल्यांनतर रस्त्यावर असे पाणी ओतले जात होते
राजस्थानातील चुरू येथे तापमान ५० अशांवर गेल्यांनतर रस्त्यावर असे पाणी ओतले जात होते

पुणे  : सूर्य अक्षरश: आग ओकत असल्याने महाराष्ट्रासह, वायव्य आणि मध्य भारतातील राज्यांमध्ये उष्णतेची लाट आहे. बुधवारी (ता.२७) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये राजस्थानातील चुरू येथे देशातील उच्चांकी ५० अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. विदर्भातील अकोला येथे राज्यातील उच्चांकी ४६.८ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. विदर्भ, मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात आज (ता.२८) उष्णतेची लाट कायम राहणार आहे. पूर्वमोसमी पावसाला पोषक हवामान होत असल्याने शुक्रवारपासून (ता.२९) कमाल तापमानात काहीशी घट होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. 

राजस्थानच्या फालोदी येथे १९ मे २०१६ रोजी देशातील आत्तापर्यंतच्या उच्चांकी ५१ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. याच दिवशी चुरू येथे आत्तापर्यंतच्या उच्चांकी ५०.२ तापमान नोंदले गेले होते. त्यानंतर बुधवारी (ता.२७) पुन्हा तापमानाचा पारा ५० अंश सेल्सिअसवर पोचला आहे. या पाठोपाठ दिल्ली येथे ४७.६ अंश, राजस्थानच्या बिकानेर येथे ४७.४, गांधीनगर येथे ४७ अंश, उत्तर प्रदेशातील झांशी येथे ४७ अंश, राजस्थानमधील पिलानी येथे ४६.९ अंश, तर महाराष्ट्रातील अकोला येथे ४६.५ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. 

उत्तर आणि वायव्य दिशेने मध्य व दक्षिण भारताकडे येणारे कोरडे वारे, उन्हाचा वाढलेला ताप यामुळे राजस्थान, पंजाब, हरियाणा, मध्य प्रदेश, गुजरात महाराष्ट्रात उन्हाचा चटका वाढला आहे. महाराष्ट्रातील परभणी, नांदेड, अकोला, अमरावती, चंद्रपूर, गोंदिया, नागपूर, वर्धा येथे उष्ण लाट आली आहे.

उत्तर भारतात पश्‍चिमी चक्रावाताची निर्मिती झाल्याने आजपासून (ता.२८) या भागात पावसाची शक्यता आहे. परिणामी दोन दिवसांत उत्तर आणि वायव्य भारतातील राज्यांमध्ये कमाल तापमानात घट होण्याची शक्यता आहे. त्यापाठोपाठ शुक्रवारपासून (ता.२९) विदर्भासह महाराष्ट्राच्या तापमानातही घट होण्याची शक्यता आहे.    बुधवारी (ता. २७) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये राज्यातील विविध ठिकाणचे कमाल तापमान (अंश सेल्सिअसमध्ये) : पुणे ३७.६, धुळे ४३.६, जळगाव ४४.७, कोल्हापूर ३६.१, महाबळेश्‍वर ३१.२, मालेगाव ४४.६, नाशिक ३७.५, निफाड ३९.०, सातारा ३८.८, सांगली ३८.४, सोलापूर ४४.६, डहाणू ३४.७, सांताक्रूझ ३४.१, रत्नागिरी ३४.८, औरंगाबाद ४२.५, परभणी ४५.५, नांदेड ४५.५, अकोला ४६.५, अमरावती ४६.६, बुलडाणा ४३.०, ब्रह्मपुरी ४३.९, चंद्रपूर ४५.२, गोंदिया ४५.०, नागपूर ४६.८, वर्धा ४६.०.    शनिवारपासून पूर्वमोसमी पाऊस  बंगालच्या उपसागरात आलेल्या ‘अम्फान’ चक्रीवादळाने बाष्प ओढून नेल्याने राज्यात गेल्या आठ दिवसांपासून पूर्वमोसमी पाऊस थांबला आहे. राज्यात पुन्हा पावसाला पोषक हवामान होत आहे. कोकणात आजपासून (ता.२८) तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे. तर शनिवारपासून (ता.३०) राज्याच्या सर्वच विभागात वादळी वाऱ्यासह पूर्वमोसमी पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. अरबी समुद्रात तयार होत असलेल्या कमी दाब क्षेत्रामुळे जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात राज्यभर पूर्वमोसमी पाऊस पडण्याची शक्यता आहे. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com