पीकपद्धतीनुसार शेतकरी उत्पादक कंपन्या स्थापन करा ः कृषिमंत्री दादा भुसे

‘सह्याद्री’सारखे मॉडेल्स राज्याच्या सर्व भागांत सुरु होण्याबाबत विचार पुढे आला. त्या पार्श्वभूमीवर राज्यभरात स्थापन झालेल्या २ हजार कंपन्यांना सक्षम करण्यासाठी सह्याद्री डिजिटल इम्पॅक्ट स्क्वेअर या कंपनीच्या सहकार्याने एफपीसी इन्क्युबेशन सेंटर सुरू करण्यात येईल. पुढील दोन महिन्यांत हे काम सुरु होणार आहे. — विलास शिंदे, अध्यक्ष, सह्याद्री फार्मर्स प्रोड्यूसर कंपनी.
इनक्युबेशन कार्यशाळेत मार्गदर्शन करताना कृषिमंत्री दादा भुसे
इनक्युबेशन कार्यशाळेत मार्गदर्शन करताना कृषिमंत्री दादा भुसे

नाशिक  : आपल्या विभाग, जिल्ह्यातील पीकपद्धतीचा प्राधान्याने विचार करून शेतकरी उत्पादक कंपनीची स्थापना करावी. शेती फायद्याची करायची असेल तर शेतकरी उत्पादक कंपनीच्या माध्यमातून शेतकऱ्यांनी एकत्र आले पाहिजे. त्यांनी केवळ अनुदान व लाभाच्या अपेक्षेने यात न येता समर्पित होऊन काम करावे, असे आवाहन कृषिमंत्री दादा भुसे यांनी केले. 

मोहाडी येथील सह्याद्री फार्म येथे शुक्रवारी (ता. १४) शेतकरी उत्पादक कंपन्यांसाठी इन्क्युबेशन कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. या वेळी मंत्री भुसे बोलत होते. या वेळी कृषी सचिव एकनाथ डवले, कृषी आयुक्त सुहास दिवसे, ‘स्मार्ट’ योजनेचे अतिरिक्त संचालक तांबारे, फलोत्पादन संचालक जमधाडे, वर्ल्ड बँकेचे सल्लागार विजय शेखर, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी संजय पडवळ, सह्याद्री फार्मर्स प्रोड्युसर कंपनीचे अध्यक्ष विलास शिंदे उपस्थित होते. या वेळी श्री.डवले म्हणाले, की इन्क्युबेशन सेंटरच्या माध्यमातून शेतकरी उत्पादक कंपन्यांना सक्षम करण्यात येणार आहे. त्यासाठी आवश्यक ती पावले उचलून काम करण्यात येईल. 

श्री. दिवसे यांनी ‘स्मार्ट’योजनेच्या उपक्रमांची माहिती दिली. ते म्हणाले,की येत्या काळात इन्क्युबेशन सेंटरच्या माध्यमातून कंपन्यांचे बळकटीकरण करण्यात येईल. विलास शिंदे व टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसचे संदीप शिंदे यांनी इन्क्युबेशन सेंटर या संकल्पनेचे सादरीकरण केले.‘टाटा स्ट्राइव्ह’चे अमेय वंजारी यांनी कौशल्यविकास प्रशिक्षण कार्यक्रमांची माहिती दिली. विभागीय अधीक्षक कृषी अधिकारी सुनील वानखेडे यांनी सूत्रसंचालन केले. 

‘‘सह्याद्री’सारख्या शंभर कंपन्या उभ्या राहव्यात’ फार्मर्स प्रोड्युसर कंपनी ही संकल्पना उपयुक्त आहे. ‘सह्याद्री’सारख्या राज्यभरात शेतकऱ्यांच्या किमान शंभर कंपन्या उभ्या राहव्यात ही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची संकल्पना आहे. येत्या काळात त्यास गती देण्यात येईल. तसेच अडचणीतील कंपन्यांनाही सहकार्य केले जाणार आहे, असे कृषिमंत्री दादा भुसे यांनी सांगितले.

शेतकरी उत्पादक कंपन्यांच्या प्रतिनिधींच्या मागण्या 

  • जीआयप्राप्त उत्पादनांसाठी विक्री व्यवस्था उभी करण्याकरिता सहकार्य करा.
  • कंपन्यांच्या खरेदी-विक्री प्रक्रियेतील जीएसटी माफ करा.
  • वीजपुरवठ्याबाबत असलेल्या अडचणी सोडविण्यासाठी पुढाकार घ्या.
  • Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com