कोळवण परिसरात प्रतिकूल हवामानामुळे आंब्याचा मोहोर गळतोय

आंब्यांना मोहोर येण्यास या वर्षी चांगली सुरुवात झाली होती; परंतु ढगाळ हवामानामुळे काही झाडांचा मोहर गळून पडला आहे; तसेच तुडतुड्यांचा काही प्रमाणात प्रादुर्भाव झाला आहे. यावर वेळीच उपाय करण्यासाठी कृषी विभागाने मार्गदर्शन शिबिर आयोजित करण्याची गरज आहे. -किरण गायकवाड, आंबा उत्पादक शेतकरी, नाणेगाव
प्रतिकूल हवामानाचा आंब्याच्या मोहरावर परिणाम होत आहे
प्रतिकूल हवामानाचा आंब्याच्या मोहरावर परिणाम होत आहे

कोळवण, जि. पुणे  : हवामानातील बदलांचा परिणाम पिकांवर होत असून, गेल्या दोन दिवसांपासून सकाळी धुके, दुपारी कडक ऊन व सायंकाळी ढगाळ हवामानामुळे आंब्याचा मोहर गळू लागला आहे. 

मुळशी तालुक्‍याच्या पश्‍चिमेकडील खेचरे-मांदेडे, भादस, कोळवण खोरे आहे. या खोऱ्याची ओळख ‘आमराई’ म्हणून आहे. कोळवण परिसरात पायरी, हापूस, तोतापुरी, रायवाळ जातीच्या आंब्यांची झाडे मोठ्या प्रमाणात आहेत. ढगाळ वातावरणाचा परिणाम आंबा उत्पादनावर होणार असल्याने अनेक शेतकरी, बागायतदार चिंतेत आहेत.

कोकणातील हापूस आंब्यापेक्षा मुळशीच्या आमराईतील आंब्यांची चव अधिक मधुर असते. बाजारात कोकणच्या आंब्याला पाचशे रुपये डझनाचा भाव मिळत असला, तरी मुळशीच्या या आंब्यांना फक्त १०० ते १५० रुपये डझन असा कमी भाव मिळतो. असे असले तरीही या भागातील शेतकरी चांगले उत्पन्न मिळवतात. अनेक शेतांमध्ये व बागांमध्ये आंब्यांच्या झाडांचे प्रमाण अधिक आहे. तरकारी व कोरडवाहू शेतकऱ्यांसाठी आंबा उत्पादन हातखर्च भागवण्यासाठी उपयोगी ठरतो. हवामानातील बदलामुळे मोहर गळू लागल्याने आंब्याच्या उत्पादनावर थेट परिणाम होणार आहे.   

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com