नागपूर जिल्ह्यातील पाणीटंचाईकडे दुर्लक्ष नको ः मंत्री डॉ. नितीन राऊत

नागपूर ः कोरोना नियंत्रणासाठी काम करीत असताना पाणीटंचाईकडे दुर्लक्ष करु नका, असे निर्देश ऊर्जामंत्री तसेच पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांनी दिले.
पालकमंत्री नितीन राऊत
पालकमंत्री नितीन राऊत

नागपूर  ः कोरोना नियंत्रणासाठी काम करीत असताना पाणीटंचाईकडे दुर्लक्ष करु नका, असे निर्देश ऊर्जामंत्री तसेच पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांनी दिले.

येथील बचतभवन सभागृहात आयोजित पाणीटंचाई आढावा बैठकीत डॉ. राऊत बोलत होते. यावेळी गृहमंत्री अनिल देशमुख, पशुसंवर्धन व दुग्धविकास मंत्री सुनील केदार, जिल्हा परिषद अध्यक्षा रश्‍मी बर्वे, खासदार कृपाल तुमाने, आमदार समीर मेघे, आशिष जयस्वाल, जिल्हाधिकारी रविंद्र ठाकरे, मुख्य कार्यकारी अधिकारी योगेश कुंभोजकर उपस्थित होते.

यावेळी डॉ. राऊत म्हणाले, की ग्रामीण पाणीपुरवठा विभागाच्या वतीने तीन टप्प्यात पाणीटंचाई कृती आराखडा राबविण्यात येत असून यावर ३१ कोटी ५५ लाख ९० हजार रुपयांचा निधी खर्च होणार आहे. यामध्ये ९०९ गावांमध्ये प्रस्तावित केलेल्या १४८८ योजनांचा समावेश आहे. जिल्ह्यात कामठी तालुक्‍यात बिडगाव व तरोडी खुर्द या दोन गावात तीन टॅंकरव्दारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे.

आराखड्यानुसार जिल्ह्यातील ९०९ गावांसाठी १४४८ उपाययोजना प्रस्तावित असून यामध्ये ३८१ नवीन विंधन विहिरी, २६३ नळ योजनांची दुरुस्ती, संभाव्य पाणीटंचाई लक्षात घेता ८७ गावांना टॅंकर व बैलगाडीने पाणीपुरवठा करणे, २१२ विहिरींचे खोलीकरण करणे, गाळ काढणे, ५०३ खासगी विहिरींचे अधिग्रहण प्रस्तावित असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले.  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com