वीज बिले न भरण्याचा ‘स्वाभिमानी’चा निर्धार

शेतकऱ्यांच्या हितासाठी कोणतेही लोकप्रतिनिधी भांडताना दिसत नाहीत. यापुढे महिन्यातील पहिल्या रविवारी स्वाभिमानी शेतकरी संघटना शेतकऱ्यांच्या तक्रारींबाबत बैठक घेऊन त्या मार्गी लावण्यासाठी पुढाकार घेईल. - राजू शेळके, जिल्हाध्यक्ष, स्वाभिमानी शेतकरी संघटना
जावळवाडी येथे वीज बिलांची होळी करताना स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे पदाधिकारी आणि ग्रामस्थ
जावळवाडी येथे वीज बिलांची होळी करताना स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे पदाधिकारी आणि ग्रामस्थ

सातारा  ः जावळवाडी (ता. सातारा) येथील मुख्य चौकात स्वाभिमानी शेतकरी संघटनेने शेतीपंपांच्या वीज बिलांची होळी करत वीज बिले न भरण्याचा एकमुखी निर्धार केला. या वेळी प्रशासनाच्या भूमिकेबाबतही तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली. 

रविवारी वीज बिल मुक्ती (जाचक नियम), शेतकरी कर्जमुक्ती या विषयावर चर्चा व उपाययोजना करण्यासाठी जावळवाडी येथे विशेष बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. बैठकीत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष राजू शेळके यांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. या वेळी प्रथम हिंगणघाट येथील प्राध्यापिका तसेच विविध स्तरावरील सामाजिक काम करणाऱ्या हुतात्म्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली.

बैठकीत अध्यक्षांच्या निवडीचा प्रस्ताव, गावोगावी शेतकरी मंच स्थापन, बैठकीसंदर्भातील भूमिका, बिल भरले जाणार नसल्याचा ठराव, कर्जवसुलीबाबत संबंधित सचिव, अध्यक्षांना अर्ज देणे, वीज बिल व कर्जमुक्ती निवेदन २४ फेब्रुवारी रोजी देणे, नादुरुस्त रोहित्र साहित्यासाठी तसेच रिक्त वायरमन जागा भरण्याची मागणी करण्यासह विविध विषयांवर चर्चा करण्यात आली.  

या वेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष राजू शेळके, आर. डी. घाडगे, सुधाकर शितोळे, संजय जाधव तसेच वर्णे व नागठाणे गटातील शेतकरी उपस्थित होते.  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com