विदर्भात उष्ण लाटेचा इशारा 

पुणे : बंगाल उपसागरात आलेल्या ‘अम्फाम’ चक्रीवादळाने बाष्प खेचून नेल्याने राज्यात कोरडे हवामान आहे. यातच राज्यात उन्हाचा चटकाही वाढण्यास सुरवात झाली आहे. अंशत: ढगाळ हवामानामुळे उकाडाही वाढला आहे. आज (ता.२१) विदर्भात उष्ण लाट येण्याचा इशारा आहे, तर उर्वरित राज्यातही उन्हाचा चटका वाढण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. बुधवारी (ता.२०) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये विदर्भातील अकोला येथे राज्यातील उच्चांकी ४४ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे.
संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

पुणे  : बंगाल उपसागरात आलेल्या ‘अम्फाम’ चक्रीवादळाने बाष्प खेचून नेल्याने राज्यात कोरडे हवामान आहे. यातच राज्यात उन्हाचा चटकाही वाढण्यास सुरवात झाली आहे. अंशत: ढगाळ हवामानामुळे उकाडाही वाढला आहे. आज (ता.२१) विदर्भात उष्ण लाट येण्याचा इशारा आहे, तर उर्वरित राज्यातही उन्हाचा चटका वाढण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. बुधवारी (ता.२०) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये विदर्भातील अकोला येथे राज्यातील उच्चांकी ४४ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. 

बंगालच्या उपसागरात आलेल्या ‘अम्फान’ चक्रीवादळामुळे उत्तर व वायव्येकडून कोरडे वारे मध्य भारताकडे येत आहे. त्यामुळे गुजरात, राजस्थान, मध्य प्रदेश, विदर्भात उष्णतेचा ताप वाढला आहे. विदर्भ, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्रात तापमान चाळीशी पार असल्याने दुपारच्या वेळी घराबाहेर पडणे तापदायक ठरत आहे. मध्य महाराष्ट्रात कमाल तापमान बहुतांशी ठिकाणी ३४ ते ४३ अंश, कोकणात ३३ ते ३५ अंश, मराठवाड्यात ४० ते ४३ अंश तर विदर्भात ४० ते ४४ अंशांच्या दरम्यान आहे. आजपासून (ता. २१) राज्यात उष्ण व कोरड्या हवामानाचा अंदाज आहे. 

बुधवारी (ता. २०) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये राज्यातील विविध ठिकाणचे कमाल तापमान (अंश सेल्सिअसमध्ये) : पुणे ३५.८, धुळे ४२.४, जळगाव ४३.२, कोल्हापूर ३४.६, महाबळेश्‍वर २८.४, मालेगाव ४०.०, नाशिक ३७.२, निफाड ३७.५, सांगली ३५.४, सातारा ३५.१, सोलापूर ४१.२, डहाणू ३४.३, सांताक्रूझ ३३.७, रत्नागिरी ३४.७, औरंगाबाद ४०.६, परभणी ४२.५, नांदेड ४१.०, अकोला ४४.०, अमरावती ४२.६, बुलडाणा ३९.७, ब्रह्मपुरी ४०.२, चंद्रपूर ४१.५, गोंदिया ३९.६, नागपूर ४२.२, वर्धा ४१.५.    मॉन्सूनची प्रगती नाही  बंगालच्या उपसागरात आलेल्या ‘अम्फान’ चक्रीवादळामुळे नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांना (मॉन्सून) चालना मिळाली. रविवारी (ता.१७) मॉन्सून दक्षिण अंदमान समुद्र, निकोबार बेटांवर डेरेदाखल झाला. मात्र हे चक्रीवादळ उत्तरेकडे सरकून गेल्यानंतर मॉन्सूनने कोणतीही प्रगती केली नाही. बुधवारी (ता.२०) मॉन्सूनच्या प्रगती झाली नाही. चक्रीवादळामुळे प्रभावित झालेले प्रवाह सुरळीत झाल्यानंतर अंदमान बेटांच्या आणखी काही प्रगती होईल असे, हवामान विभागाच्या सूत्रांनी सांगितले. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com