ढगाळ वातावरणामुळे तेरा केंद्रांवर कापूस खरेदी बंद

संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

नागपूर  ः राज्यात ढगाळ वातावरणाच्या पार्श्‍वभूमीवर यवतमाळमधील सात, खानदेशातील तीन आणि बुलडाणा जिल्ह्यातील तीन केंद्रांवरील शासकीय कापूस खरेदी पुढील आदेशापर्यंत बंद करण्यात आली आहे. महाराष्ट्र राज्य सहकारी कापूस पणन महासंघाने २७ नोव्हेंबरपासून आजपर्यंत सुमारे ७४ कोटी रुपयांच्या कापसाची खरेदी केल्याचे सूत्रांनी सांगितले. 

खासगी बाजारात कापसाचे ४६०० रुपये क्‍विंटल दराने व्यवहार होत आहेत. शासकीय केंद्रांवर कापूस विक्री केल्यास ५५५० रुपयांचा दर दिला जातो. यामुळेच शेतकऱ्यांचा कल शासकीय केंद्रांवर कापूस विक्रीकडे वाढला आहे. ‘सीसीआय’चा एजंट म्हणून महाराष्ट्र राज्य सहकारी कापूस उत्पादक पणन महासंघाकडून खरेदी होत आहे. कापूस पणन महासंघ राज्यात ५३ केंद्रांवर खरेदी करीत असून, त्याद्वारे चार लाख ७५ हजार ५६४ क्‍विंटल कापसाची खरेदी झाली आहे. ३२ कोटी रुपयांचे चुकारे विदर्भात, तर ४२ कोटी रुपयांचे चुकारे उर्वरित राज्यात वितरित करण्यात आले आहेत.

यानुसार सुमारे ७४ कोटी रुपयांचे चुकारे करण्यात आल्याचे ‘पणन’च्या सूत्रांनी सांगितले. ‘सीसीआय’ची ८७ केंद्रांच्या माध्यमातून सात लाख क्‍विंटल कापूस खरेदी झाली आहे. खासगी व्यापाऱ्यांनी २२ लाख ७५ हजार क्‍विंटल कापूस घेतला आहे.    या केंद्रांवर खरेदी बंद ढगाळ वातावरणाच्या पार्श्‍वभूमीवर यवतमाळ जिल्ह्यातील सात खरेदी केंद्रे बंद करण्याचे आदेश तेथील जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत. बुलडाणा जिल्ह्यातील जळगाव, देऊळगावराजा तसेच खानदेशातील भडगाव, अमळनेर वगळता इतर तीन केंद्रे बंद ठेवण्यात आली आहेत, अशी माहिती पणन महासंघाचे अध्यक्ष अनंतराव देशमुख यांनी दिली. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com