नंदुरबार जिल्ह्यात पपईला मिळेनात अपेक्षित दर

खरेदीदार राजस्थान, दिल्ली, मध्य प्रदेश यासह जळगावमधील रावेर, धुळ्यातील शिंदखेडा भागातील आहेत. परराज्यांतील व्यापाऱ्यांचे एजंट सौदे ठरवितात. ही मंडळी एकत्र येऊन दर पाडण्याचे काम करतात. शेतकऱ्यांचे नुकसान होते; पण प्रशासन दखल देत नाही. - हितेश पटेल, शेतकरी, शहादा
संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

नंदुरबार  ः पपई काढणीचा हंगाम सुरू होऊन एक महिना झालेला असतानाच आता मागील वर्षाप्रमाणे व्यापारी, एजंट लॉबीने दर कमी देण्यास सुरुवात केली आहे. प्रतिकिलो १० ते आठ रुपये दर जागेवर दिला जात असून, हे दर परवडणारे नसल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. 

मागील हंगामात पपईची लागवड दुष्काळामुळे कमी झाली. यातच अतिपावसाने व प्रतिकूल हवामानामुळे जळगाव, चोपडा, यावल, धुळ्यातील शिरपूर, नंदुरबारमधील तळोदा, शहादा भागात पपईचे नुकसान झाले. काही शेतकऱ्यांच्या अथक परिश्रमामुळे पीक जोमात आहे. सुरुवातीला त्यांना १८ रुपये प्रतिकिलोचा दर जागेवरच मिळाला. परंतु मागील १५ ते २० दिवसांपासून दरांचा तिढा वाढला आहे. जागेवरच आता १० ते आठ रुपये प्रतिकिलोचा दर दिला जात आहे. मागील वर्षीदेखील हळूहळू कमी दर देण्यास व्यापाऱ्यांनी सुरुवात केली होती. याचा मोठा फटका शेतकऱ्यांना बसला होता.

यंदाही अशीच स्थिती व्यापारी तयार करीत आहेत. पपईला किमान प्रतिकिलो १५ रुपये दर मिळावा, अशी अपेक्षा शेतकरी व्यक्त करीत आहेत. या प्रश्‍नी प्रशासनाने हस्तक्षेप करून तातडीने व्यापारी, एजंट व शेतकरी यांची बैठक घ्यावी व ही समस्या दूर करावी, असा मुद्दा शेतकरी उपस्थित करीत आहेत.   

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com