सांगलीतील द्राक्ष उत्पादकांचा ओढा बेदाणा निर्मितीकडे

बाजारपेठेत अजून द्राक्षाला ग्राहक नाही. त्यामुळे द्राक्षांचे नुकसान करण्यापेक्षा त्यापासून बेदाणा तयार करण्याचा निर्णय घेतला असून द्राक्षे रॅकवर टाकण्यास सुरवात केली आहे. - सुभाष आर्वे, माजी अध्यक्ष, राज्य द्राक्ष बागायतदार संघ.
संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

सांगली  : द्राक्षांची वाहतूक सुरु झाली असली तरी संचारबंदीमुळे बाजारपेठेत द्राक्षांना मागणी घटली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील द्राक्ष उत्पादक शेतकरी बेदाणा निर्मितीकडे वळाले आहेत.

जिल्ह्यात सुमारे ३० ते ४० टक्के द्राक्ष हंगाम शिल्लक आहे. दोन दिवसांपासून जिल्ह्यातून द्राक्ष वाहतूक सुरु झाली आहे. दोन दिवसांत सुमारे १५० ते २०० गाड्या देशभरात गेल्या आहेत. मात्र, देशभरातील मुख्य बाजारपेठा बंद आहेत. त्यामुळे द्राक्ष विक्रीस अडचणी निर्माण झाल्या आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी स्वतः द्राक्ष विक्रीसाठी पाऊले उचलली आहेत. काही बाजारपेठेतही द्राक्षांची विक्री होत आहे.

परंतु, संचारबंदी असल्याने द्राक्षाला अपेक्षित मागणी नाही. त्यामुळे बाजारपेठेत गेलेली द्राक्षे कशी विकली जाणार असा प्रश्न द्राक्ष उत्पादकांना पडला आहे. तासगाव, मिरज, कवठेमहांकाळ आणि जत तालुक्यात दर्जेदार बेदाणा तयार केला जात आहे. परंतू ‘कोरोना’च्या पार्श्वभूमीवर द्राक्षाला मागणी कमी झाली असल्याचे द्राक्ष उत्पादकांनी सांगितले. त्यामुळे बेदाणा निर्मितीसाठी शेतकरी पुढाकार घेत आहेत.

ज्या भागातील बेदाणा शेड बंद होते, त्याची दुरुस्ती करण्यास शेतकऱ्यांनी सुरवात केली आहे. दोन दिवसांत बेदाणा शेडची दुरुस्ती करुन बेदाणा तयार करण्यासाठी द्राक्षे रॅकवर टाकली जाणार आहेत,अशी माहिती द्राक्ष उत्पादकांनी दिली.  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com