तीन दिवसांच्या बंद नंतर नाशिक बाजारसमितीतील व्यवहार शुक्रवारपासून सुरु झाले
तीन दिवसांच्या बंद नंतर नाशिक बाजारसमितीतील व्यवहार शुक्रवारपासून सुरु झाले

नाशिक बाजार समिती पुन्हा सुरु; नियमितच्या तुलनेत अवघी २० टक्के आवक

नाशिक : नाशिक बाजार समितीत दोन कोरोनाबाधित रुग्ण आढळून आल्याने कामकाज तीन दिवस बंद होते. मात्र स्वच्छता व निर्जंतुकीकरण प्रक्रिया पूर्ण होऊन शुक्रवारपासून (ता.२९) बाजार समिती पुन्हा सुरु झाली. बाजारसमितीत शुक्रवारी नियमित आवकेच्या तुलनेत आवक अवघी २० टक्के होती. तसेच बाजारसमितीत फारशी गर्दी नसल्याचेही दिसून आले. नाशिक महानगरपालिकेने दिलेल्या काटेकोर सूचनांचे पालन करीत बाजार समितीचे संपूर्ण व्यवहार पुन्हा सुरळीत झाले आहेत.

नाशिक  : नाशिक बाजार समितीत दोन कोरोनाबाधित रुग्ण आढळून आल्याने कामकाज तीन दिवस बंद होते. मात्र स्वच्छता व निर्जंतुकीकरण प्रक्रिया पूर्ण होऊन शुक्रवारपासून (ता.२९) बाजार समिती पुन्हा सुरु झाली. बाजारसमितीत शुक्रवारी नियमित आवकेच्या तुलनेत आवक अवघी २० टक्के होती. तसेच बाजारसमितीत फारशी गर्दी नसल्याचेही दिसून आले. नाशिक महानगरपालिकेने दिलेल्या काटेकोर सूचनांचे पालन करीत बाजार समितीचे संपूर्ण व्यवहार पुन्हा सुरळीत झाले आहेत.

बाजार समितीचे कामकाज २६ ते २८ मे दरम्यान बंद राहिल्याने सुमारे १२ कोटी रुपयांची उलाढाल ठप्प झाली होती. यानंतर नाशिक महापालिकेचे आयुक्त राधाकृष्ण गमे यांच्यासोबत झालेल्या बैठकीत बाजार समितीचे सभापती संपतराव सकाळे यांना काही नियमांबाबत सूचना दिल्यानंतर पुन्हा कामकाज सुरू झाले आहे. मात्र पेठ रोडवरील शरदचंद्र पवार बाजार आवारात रात्रीचे खरेदी विक्रीचे व्यवहार व पंचवटी आवारातील किरकोळ व्यवहार बंद राहणार आहेत. बाजारात अनावश्यक गर्दी टाळण्यासाठी वाहनाबरोबर शेतकऱ्यासह एकाच व्यक्तीला प्रवेश देण्यात आला. बाजार आवारात येणारे अडते, व्यापारी व हमाली कामगार या घटकांना ओळखपत्राशिवाय प्रवेश नाकारण्यात आला. फक्त शेतीमालाचे लिलाव सुरू असून किरकोळ विक्री बंद केली आहे.त्यामुळे किरकोळ खरेदीदारांना प्रवेश देण्यात आला नाही.

तसेच अनधिकृत इसम अथवा फेरीवाले यांना प्रवेशास मनाई करण्यात करण्यात आली आहे. आवारात प्रवेश करताना संशयित रुग्णांची वैद्यकीय तपासणी केली जात असून लहान मुले व वृद्धांना प्रवेश नाकारण्यात आला आहे. तसेच प्रत्येकाला रुमाल व मास्क बंधनकारक असून गेटवर येताना प्रत्येकाचे तापमान तपासूनच बाजार समिती आवारात प्रवेश देण्यात येत आहे.

ज्या शेतकऱ्यांना किरकोळ पद्धतीने शेतीमाल विकायचा आहे, त्यांना तो महानगरपालिका प्रशासनाने शहरात ठरवून दिलेल्या वेगवेगळ्या क्षेत्रावरच विकता करता येईल,असे महापालिका आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी स्पष्ट केले आहे. या व्यतिरिक्त शेतकऱ्यांनी शेतमाल अडत्यांकडे विकावा, जे शेतकरी किरकोळ शेतमाल विकतील त्यांचा शेतमाल जप्त करण्यात येईल, किरकोळ शेतमाल खरेदी करणाऱ्या व्यापाऱ्यांवर दंडात्मक कारवाईचा इशारा देण्यात आला आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com