मुंबईतील घाऊक व्यापाऱ्यांना शेतमालाचा पुरवठा सुरू ठेवा : बाजारसमितीची व्यापाऱ्यांना सूचना

मुंबई : मुंबई आणि परिसरात कोरोनाचा वाढत्या प्रसाराच्या पार्श्वभूमीवर बाजार समितीचे भाजीपाला, फळ आणि कांदा-बटाटा बाजार बंद ठेवण्यात आले आहेत. मात्र, गेले काही दिवस बाजार आवारातील गर्दीचे विकेंद्रीकरण व्हावे यासाठी अर्ध्याहून अधिक भाजीपाला वाहने थेट मुंबईत सोडली जात आहेत. तसेच बाजार समितीतील व्यापारी आणि अडत्यांनी शेतकऱ्यांकडील शेतमालाचा थेट पुरवठा घाऊक व्यापाऱ्यांना सुरू ठेवून मुंबई आणि परिसरात शेतीमालाचा तुटवडा भासणार नाही याची दक्षता घ्यावी अशा सूचनाही त्यांना केल्याचे मुंबई बाजार समितीचे प्रशासक तथा सचिव अनिल चव्हाण यांनी सांगितले.
संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

मुंबई  : मुंबई आणि परिसरात कोरोनाचा वाढत्या प्रसाराच्या पार्श्वभूमीवर बाजार समितीचे भाजीपाला, फळ आणि कांदा-बटाटा बाजार बंद ठेवण्यात आले आहेत. मात्र, गेले काही दिवस बाजार आवारातील गर्दीचे विकेंद्रीकरण व्हावे यासाठी अर्ध्याहून अधिक भाजीपाला वाहने थेट मुंबईत सोडली जात आहेत. तसेच बाजार समितीतील व्यापारी आणि अडत्यांनी शेतकऱ्यांकडील शेतमालाचा थेट पुरवठा घाऊक व्यापाऱ्यांना सुरू ठेवून मुंबई आणि परिसरात शेतीमालाचा तुटवडा भासणार नाही याची दक्षता घ्यावी अशा सूचनाही त्यांना केल्याचे मुंबई बाजार समितीचे प्रशासक तथा सचिव अनिल चव्हाण यांनी सांगितले. 

कोरोनाच्या प्रार्दुभाव रोखण्यासाठी लॉकडाऊन जाहीर असला तरी मुंबई आणि परिसरात जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा सुरळीत व्हावा यासाठी मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीने कांदा-बटाटा, भाजीपाला, फळे, मसाला मार्केट आणि धान्य बाजार सुरू ठेवले होते. कोरोनाला प्रतिबंध करण्यासाठी समिती प्रशासनाने विविध उपाययोजना राबविल्या होत्या. मात्र, मुंबई आणि परिसरात कोरोनाचा वाढत्या प्रसारामुळे बाजार आवारातील घटकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. व्यापारी संघटनांच्या विनंतीनुसार शनिवारपासून (ता.११) मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीतील भाजीपाला, फळ आणि कांदा बटाटा बाजार बंद करण्याचा निर्णय बाजार समिती प्रशासनाने घेतला आहे. 

बाजार समितीत दैनंदिन कामकाजासाठी व्यापारी, अडते, माथाडी, मजूर, खरेदीदार आदी विविध घटकांचे सुमारे २५ ते ३५ हजार प्रतिनिधी एकत्र येतात. समिती प्रशासनाकडून अनेक उपाययोजना केल्या जातात, हे खरे असले तरी इतक्या मोठ्या लोकसंख्येवर नियंत्रण ठेवणे शक्य होत नाही.

बाजार आवारात कोरोना विषाणूच्या सामूहिक संसर्गाची शक्यता व्यक्त केल्यामुळे व्यापारी, अडते, माथाडी आदी घटकांमध्ये भीतीचे वातावरण आहे, दैनंदिन कामासाठी मजूर येत नाहीत. शेतीमाल उतरून घेण्यासही माणसं उपलब्ध होत नाहीत, अशी माहिती व्यापारी वर्गातून देण्यात आली. त्याचमुळे घाऊक भाजीपाला व्यापारी महासंघ, फ्रंट ऑफ युनायटेड फ्रूट्स असोसिएशन, कांदा-बटाटा अडत व्यापारी संघ व्यापारी संघटनांकडून बाजार आवार बंद ठेवण्याची मागणी करण्यात आली होती, असेही व्यापाऱ्यांकडून सांगण्यात आले.   आठवडाभर बंद दुसरीकडे दिवसागणिक मुंबई व परिसरात वाढत असलेल्या कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या पाहता शासनाने कठोर पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. उद्या (आज)पासून एक आठवडाभर मुंबई व नवी मुंबई परिसरातील भाजीपाला मार्केट एक आठवडा बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती वस्त्रोद्योग, मत्स्यसंवर्धन व बंदरविकास आणि मुंबई शहराचे पालकमंत्री असलम शेख यांनी दिली.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com