सातारा जिल्हा बॅंकेकडून कर्ज व्याजदरात कपात

सातारा : `कोरोना’च्या पार्श्वभूमीवर सुरु असलेल्या लॉकडाउनमध्ये शेतकरी व ग्राहकांना आधार देण्यासाठी जिल्हा बॅंकेने कर्ज व्याजदरात अर्धा ते दोन टक्‍क्‍यांपर्यंत कपात केली आहे. त्याचा जिल्ह्यातील साडेतीन लाख शेतकऱ्यांना लाभ होणार आहे. तसेच शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी विविध योजना व सवलती देखील लागू केल्या आहेत.
संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

सातारा  : `कोरोना’च्या पार्श्वभूमीवर सुरु असलेल्या लॉकडाउनमध्ये शेतकरी व ग्राहकांना आधार देण्यासाठी जिल्हा बॅंकेने कर्ज व्याजदरात अर्धा ते दोन टक्‍क्‍यांपर्यंत कपात केली आहे. त्याचा जिल्ह्यातील साडेतीन लाख शेतकऱ्यांना लाभ होणार आहे. तसेच शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी विविध योजना व सवलती देखील लागू केल्या आहेत.

बॅंकेचे अध्यक्ष आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी याबाबतची माहिती शुक्रवारी पत्रकार परिषदेत दिली. त्यांनी लॉकडाउनच्या पार्श्‍वभूमीवर उद्‌भवलेल्या परिस्थितीसंदर्भात संचालक मंडळाची बैठक झाल्याचे सांगून, त्यामधील निर्णयांची माहिती दिली. या वेळी सहकारमंत्री व तज्ज्ञ संचालक बाळासाहेब पाटील, उपाध्यक्ष सुनील माने, संचालक अनिल देसाई, दत्तानाना ढमाळ, प्रदीप विधाते, माजी आमदार प्रभाकर घार्गे, मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र सरकाळे उपस्थित होते.

श्री. भोसले म्हणाले, की जिल्ह्यात द्राक्षबाग, कुक्कुटपालन, कृषी पर्यटन व्यवसायाचे प्रचंड नुकसान झाले आहे. बॅंकेने या व्यवसायाला कर्जपुरवठा केला आहे. त्यांना दिलासा देण्यासाठी त्यांनी परतफेड केलेल्या वसूलपात्र हप्त्यावरील व्याजाचा परतावा देण्याचे धोरण स्वीकारले आहे. त्यासाठी ५० लाखांची तरतूद केली आहे. पगारदार कर्मचाऱ्यांना ३५ लाखांपर्यंतचा विमा देण्याची कार्यवाही अंतिम टप्प्यात असून, त्याचा फायदा बॅंकेच्या सर्व कर्मचाऱ्यांना होणार आहे.

सोने तारण कर्जपुरवठ्यावरील व्याजदरात १.२५ टक्के कपात केली आहे. त्यामुळे ग्राहकांना दहा टक्के दराने सोने तारण कर्ज मिळेल, तसेच प्रती ग्रॅममागे २८ हजार ५०० रुपये कर्ज उपलब्ध होणार आहे. व्याजदर कपातीने सभासदांना दिलासा मिळणार असला, तरी बॅंकेवर अंदाजे बारा कोटींचा बोजा पडणार आहे. बॅंकेच्या अन्य कर्जाच्या योजनांवरही अर्धा ते दोन टक्क्‍यांपर्यंत कपात करण्यात आली आहे. त्याचा फायदा सोसायट्यांच्या माध्यमातून कर्ज घेणाऱ्या जिल्ह्यातील साडेतीन लाख शेतकऱ्यांना होणार आहे, असे त्यांनी सांगितले.

कर्जमाफी मिळालेले शेतकरी कर्जासाठी पात्र राज्य सरकारच्या कृषी कर्जमाफी योजनेत सातारा जिल्हा मध्यवर्ती बॅंकेकडील ४२ हजार शेतकरी खातेदार पात्र ठरले असून, त्यांना २२४ कोटी रुपयांची कर्जमाफी मिळाली आहे. यापैकी ३५ हजार शेतकऱ्यांच्या खात्यांवर १८४ कोटी जमा झाले आहेत. उर्वरित तिसऱ्या यादीतील शेतकरी खातेदारांवर कर्ज नाही, असे गृहित धरून पुढील कर्जासाठी त्यांना पात्र ठरविण्यात आले असल्याची माहिती सहकारमंत्री बाळासाहेब पाटील यांनी दिली.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com