जळगाव बाजारसमितीत सोशल डिस्टन्सिंगकडे दुर्लक्ष 

जळगाव ः येथील बाजार समितीत भाजीपाल्याची आवक सुरू आहे. परंतु खरेदीसाठी नागरिकांची एवढी गर्दी होत आहे, की ती नियंत्रीत करणे कठीण झाले आहे. गोंधळ वाढत असून;‘कोरोना’च्या भितीमुळे बाजार समितीचे कर्मचारीदेखील गर्दी आवरण्यासाठी नकार देत आहेत.
बाजारसमितीत सोशल डिस्टन्सिंगला हरताळ फासला जात आहे.
बाजारसमितीत सोशल डिस्टन्सिंगला हरताळ फासला जात आहे.

जळगाव  ः येथील बाजार समितीत भाजीपाल्याची आवक सुरू आहे. परंतु खरेदीसाठी नागरिकांची एवढी गर्दी होत आहे, की ती नियंत्रीत करणे कठीण झाले आहे. गोंधळ वाढत असून;‘कोरोना’च्या भितीमुळे बाजार समितीचे कर्मचारीदेखील गर्दी आवरण्यासाठी नकार देत आहेत. 

बाजारात लिलावही होत आहेत. बाजार समितीचे कर्मचारी मात्र कामास येण्यासह लिलाव प्रक्रिया सुरळीत करण्यासाठी नकार देत आहेत. येथे सोशल डिस्टन्सिंगकडे सपशेल दुर्लक्ष केले जात आहे. जामनेर, एरंडोल, धरणगाव, यावल, भुसावळ, चोपडा, जालना, औरंगाबाद, बुलडाणा जिल्ह्यातील भाजीपाला उत्पादक विविध शेतमाल आणत आहेत. सोमवारी (ता.३०) आवक पुरेशी तसेच सुरळीत झाली. परंतू, शनिवारी (ता.२८) जशी गर्दी झाली, तशीच गर्दी सोमवारी झाली. कारण जिल्ह्यातील इतर बाजार समित्यांमध्ये व्यवहार, लिलाव विस्कळीत झाले आहेत. भाज्यांची विक्री करणे शेतकऱ्यांना अत्यावश्‍यक आहे. विक्री झाली नाही तर मोठे नुकसान सहन करावे लागत आहे. जिल्हा प्रशासनाने बाजार समिती बंद ठेवू नका, शेतमाल, भाजीपाल्याचे लिलाव सुरळीत करून त्याचा पुरवठा विस्कळीत होवू देवू नका, असे बजावले आहे. यामुळे बाजार समितीमध्ये लिलाव होत आहेत. परंतू, गर्दी वाढल्याने बाजार समिती प्रशासनाने जिल्हा पोलीस विभागाकडे बंदोबस्त मागितला. मात्र, हा बंदोबस्त प्रशासनाकडून मिळाला नाही, अशी माहिती एका संचालकांनी दिली. 

बाजारात हात धुण्यासाठी सॅनिटायझर, स्वच्छता याकडे गांभिर्याने पाहिले जात नसल्याची स्थिती आहे. घाईघाईने लिलाव उरकले जात आहेत. शेतकऱ्यांना उधारीने व कमी दरात भाजीपाल्याची विक्री करावी लागत असल्याची स्थिती आहे. 

बाजारात मिरची, कांदयाचे दर स्थिर आहेत. मिरचीची सोमवारी २३ क्विंटल आवक झाली. दर कमाल २५०० रुपये क्विंटलपर्यंत मिळाले. कांद्याची ७०० क्विंटल आवक झाली. कांद्याला १५०० ते ३००० रुपये क्विंटल दर मिळाले. वांग्यांची २१ क्विंटल आवक झाली. यास १२०० ते २००० रुपये क्विंटलपर्यंत दर मिळाले. शेवग्याची सुमारे दोन क्विंटल आवक झाली. शेवग्याला १८०० रुपये क्विंटल दर मिळाला. गवार, मेथी, पालक, पोकळा यांचीही आवक स्थिर आहे. शेतकऱ्यांना मात्र अपेक्षित दर मिळत नाहीत. तसेच विक्रेते किरकोळ बाजारात चढ्या दरात भाजीपाल्याची विक्री करीत असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com