मुक्त अर्थव्यवस्था स्वीकारल्यानंतर शेतीमालाचे बाजारभाव पडू लागले : विजय जावंधिया

विजय जावंधिया
विजय जावंधिया

शेवगाव, जि. नगर : ‘‘सत्तेत येण्यापूर्वी शेतकरीहिताची भाषा बोलणारे पक्ष सत्तेत बसले की आपोआपच शेतकरीविरोधी होतात. मुक्त अर्थव्यवस्था स्वीकारल्यानंतर जागतिक बाजारपेठेत शेतीमालाचे बाजारभाव पडू लागले. त्यामुळे १९९१नंतर शेती आणि शेतकऱ्यांची दुरवस्था सुरू झाली,’’ असे मत ज्येष्ठ कृषी अभ्यासक विजय जावंधिया यांनी व्यक्त केले.

नगर जिल्ह्यामधील शेवगाव येथील प्रवरा मेडिकल ट्रस्टतर्फे आयोजित (स्व.) बाळासाहेब विखे पाटील स्मृती व्याख्यानमालेतील दुसरे पुष्प गुंफताना ‘उत्तम शेती कनिष्ठ का झाली?’ या विषयावर जावंधिया बोलत होते. 

शेवगाव शैक्षणिक संकुलाचे कार्यकारी संचालक डॉ. युवराज नरवडे, आयुर्वेद महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. भागवत शिंदे, प्राचार्य डॉ. ओंकार रसाळ, शिवाजी देवढे, उत्तम आहेर, एस. व्ही. कुलकर्णी, बापूसाहेब भोसले आदी उपस्थित होते. 

विजय जावंधिया म्हणाले, की शहराच्या विकासासाठी खेड्याचे शोषण होते, हे संपूर्ण जगातील विकासाचे धोरण भारतातही आहे. त्यामुळे खेडी ओस पडून शहरे फुगली. शेतीतून मिळणारे उत्पादन व खर्च यांचा ताळमेळ बसत नसल्याने शेतकऱ्यांच्या मुलांनाही शेती करण्यात स्वारस्य उरलेले नाही. रुपयाचे अवमूल्यन, वाढता उत्पादनखर्च, जागतिक बाजारपेठेत कोसळणारे शेतमालाचे भाव, सरकारी शेतकरीविरोधी धोरण यामुळे शेती परवडत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढत आहेत. वास्तविक विकसित देशातही सरकारी मदतीशिवाय शेती केली जात नाही. भारतात कर्मचाऱ्यांना वेतन आयोग देण्यासाठी सरकारकडे पैसे आहेत, शेतकऱ्यांना काही देण्याची वेळ आली की चर्चाच फार होते, म्हणून शेतकरी निराश होत चालला आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com