शिराळा तालुक्यात केवळ सहा गुऱ्हाळघरे सुरू

महापुरामुळे उसाचे नुकसान झाल्याने उतारा अपेक्षित मिळणार नाही. गुळाला अपेक्षित दर नाही, तसेच त्यात मजुरांची कमतरता, यामुळे यंदाच्या हंगामात गुऱ्हाळघर सुरू केलेले नाही. - अमर मुलाणी, गुऱ्हाळ घरमालक, कोकरूड, जि. सांगली.
संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

सांगली  ः शिराळा तालुक्यात महापुरामुळे उसाचे नुकसान झाले, त्यामुळे गूळ उत्पादनात घट होणार आहे. तसेच, सध्या गुळाला अपेक्षित दर मिळत नसल्याने त्याचा परिणाम गुऱ्हाळघरांवर झाला असून, तालुक्यात सध्या केवळ सहा गुऱ्हाळघरे सुरू आहेत. 

शिराळा तालुक्यात भात पिकाबरोबर गूळ उत्पादन मोठ्या प्रमाणात होते. या वर्षी महापूर आणि पावसाने गुऱ्हाळघरांची पडझड झाली होती. त्यांची दुरुस्ती केली गेली. या तालुक्यातील गुऱ्हाळघरे दसरा- दिवाळीच्या दरम्यान सुरू होतात. मात्र, यंदाच्या हंगामावर महापूर आणि अतिवृष्टीचे संकट होते, त्यामुळे हंगाम उशिरा सुरू झाला आहे. तालुक्यात ६० ते ७० गुऱ्हाळघरे असायची. गेल्या तीन ते चार वर्षांत अवघी १५ ते २० घरे सुरू होत होती. गेल्या वर्षी १० ते १२ सुरू होती. यंदा उसाची कमतरता आणि गुळाला अपेक्षित दर मिळत नाही, त्यामुळे गूळ उत्पादनाचा खर्चदेखील वाढला आहे. त्यामुळे यंदाच्या हंगामात कणदूर आणि पुनवत या दोन गावांत प्रत्येकी एक, तर कोकरूडमध्ये ४ अशी एकूण सहा गुऱ्हाळघरे सुरू आहेत. 

एका गुऱ्हाळघरासाठी किमान २५ माणसांची गरज असते. सध्या मालकांना कामगार मिळेनासे झाले आहेत. गूळ साहित्याचे दर वाढलेले आहेत. गुळाला अपेक्षित दर मिळत नाही. भांडवलाची कमतरता आहे. कामगारांना पगार वाढवून द्यावे लागत आहेत, उचली द्याव्या लागत आहेत. अशा अनेक समस्यांमुळे जिल्ह्यातील गूळ उद्योग अडचणीत आला आहे.   

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com