शेतकरी हा राज्याच्या अर्थव्यवस्थेचा प्रमुख घटक : मुख्यमंत्री उध्दव ठाकरे

मुख्यमंत्री उध्दव ठाकरे
मुख्यमंत्री उध्दव ठाकरे

नाशिक  : शेतकरी हा राज्याच्या अर्थव्यवस्थेचा प्रमुख घटक आहे. राज्य शासन शेतकऱ्यांसाठी अनेक योजना प्राधान्याने राबवित आहे. शासन शेतकरी हितास प्राधान्य देत आहे. राज्यातील शेतकरी केंद्रबिंदू मानून त्यांचे जीवन सुखकर होण्यासाठी राज्य शासन प्रयत्नशील आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले. 

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली नाशिक विभागातील सर्व जिल्ह्यांची आढावा बैठक गुरुवारी (ता. ३०) नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडली. या वेळी ते बोलत होते. महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, अन्न व नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ, कृषिमंत्री दादा भुसे, पाणीपुरवठा व स्वच्छतामंत्री गुलाबराव पाटील, आदिवासी विकासमंत्री के. सी. पाडवी, राज्यमंत्री अब्दुल सत्तार या वेळी उपस्थित होते. 

आढावा बैठकीतील प्रमुख निर्णय : 

  • पश्चिमवाहिनी नद्यांचे पाणी गोदावरी खोऱ्यात आणण्यासाठी राज्यस्तरीय बैठक घेणार, प्रकल्प मंजुरीसाठी केंद्राकडे पाठपुरावा करणार.
  • ‘जलयुक्त शिवार’ची सुरू असलेली कामे पूर्ण करण्यात येणार. 
  • कृषिपंपांना अधिक वेळ वीजपुरवठा करण्याचा प्रयत्न करणार.
  • पीकविमा प्रश्न सोडवण्यासाठी नवीन कंपन्यांशी चर्चा करणार. 
  • राज्यातील अनुसूचित क्षेत्रातील बाराशे गावांचा ‘पेसा’मध्ये समावेश करून आठ दिवसांत प्रस्ताव केंद्राला पाठविणार.
  • Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com