पुणे : मराठवाडा, विदर्भात पुरवठा करण्यात आलेल्या बोगस बियाण्याला बीज प्रमाणीकरण यंत्रणेतील भ्रष्ट रॅकेट कारणीभूत आहे. या रॅकेटची चौकशी करावी; तसेच शेतकऱ्यांना बियाणे खरेदीच्या पावत्या न देणाऱ्या दुकानांचे परवाने तत्काळ रद्द करावेत, अशा मागण्या काँग्रेसने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केल्या आहेत.
युवक काँग्रेसचे प्रवक्ते हनुमंत पवार यांनी मुख्यमंत्र्यांना पाठवलेल्या निवेदनात सात मागण्या केल्या आहेत. सोयाबीन बियाणे उत्पादक कंपन्यांनी मोठ्या प्रमाणात यंदा बोगस बियाण्यांची विक्री केली आहे. ‘महाबीज’सह खाजगी कंपन्यांनी बियाण्यांचे दर २५ टक्क्यांनी वाढवले. यामुळे सोयाबीनची ३० किलोची बॅग २२५० ते २५५० रुपयांपर्यंत विकली गेली. शेतकऱ्यांना पेरा करेपर्यंत एकरी १५,००० रुपये खर्च करावे लागतात. बोगस बियाण्यांमुळे हा खर्चही वाया गेला आहे, असे काँग्रेसने म्हटले आहे.
बियाणे विक्रीत ‘महाबीज’चा वाटा ४२ ते ४५ टक्के इतका मोठा आहे. या वर्षी ३ लाख क्विंटल बियाणे एकट्या महाबीजचे आहे. त्यामुळे यंत्रणेची चौकशी व्हावी. अधिकाऱ्यांकडून खोटी कारणे देत पंचनाम्यात शेतकरी वर्गाची बाजू डावलली जात आहे. हेच पंचनामे घेऊन कंपन्या न्यायालयात सुटतात. शेतकरीच जबाबदार असल्याचे सांगत पळवाट काढतात. बियाणे विक्रेते शेतकऱ्यांनी आग्रह धरूनही पावत्या देत नाहीत. पावती नसेल तर पंचनामा करताना अडचण होते. त्यामुळे पावती न देणाऱ्या दुकानांचा परवाना रद्द करावा, अशीही मागणी करण्यात आली आहे. या आहेत मागण्या
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.