साताऱ्यात सोयाबीन उगवण क्षमता चाचणीचे शेतकऱ्यांना थेट प्रशिक्षण 

सातारा : सातारा जिल्ह्यात सोयाबीन बियाणे उगवण क्षमता चाचणीसाठी कृषी विभाग सरसावला असून, शेतकऱ्यांना थेट मार्गदर्शन करण्यात येत आहे.
सासपडे येथील बाळकृष्ण यादव यांच्या सोयाबीन बियाण्याची उगवण क्षमता चाचणी करताना अंकुश सोनावले.
सासपडे येथील बाळकृष्ण यादव यांच्या सोयाबीन बियाण्याची उगवण क्षमता चाचणी करताना अंकुश सोनावले.

सातारा   : सातारा जिल्ह्यात सोयाबीन बियाणे उगवण क्षमता चाचणीसाठी कृषी विभाग सरसावला असून, शेतकऱ्यांना थेट मार्गदर्शन करण्यात येत आहे. 

सासपडे (जि. सातारा) येथे सोयाबीन बियाणे उगवण क्षमता चाचणी प्रात्यक्षिक घेण्यात आले. यावेळी श्री. सोनावले म्हणाले, की येत्या खरीप हंगामात कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी कृषी सेवा केंद्रात शेतक-यांची बियाणे खरेदीसाठी होणारी गर्दी कमी करणे आणि उत्पादन खर्चात बचत करणे या दुहेरी उद्देशाने  तालुका कृषी आधिकारी अजित पिसाळ,  कृषी उपसंचालक विजय राऊत आणि जिल्हा अधिक्षक कृषी आधिकारी महेश झेंडे यांचे मार्गदर्शनातून सोयाबीन बियाणे उगवण क्षमता चाचणी प्रत्येक गावात आयोजित केली आहे. 

अशा प्रकारची सोयाबीन बियाणे उगवण क्षमता चाचणी प्रात्यक्षिके बोरगाव, नांदगाव, निनाम, वेणेगाव या गावात मंडल कृषी आधिकारी युवराज काटे,  कृषी पर्यवेक्षक रोहिदास तिटकारे, कृषी सहायक विजया जाधव, एम. डी. ठुबे, देवराज पवार यांच्या प्रयत्नातून यशस्वीपणे राबविण्यात आली असल्याची माहिती यावेळी श्री. सोनावले यांनी दिली.   सोयाबीन उगवण क्षमता चाचणी घेताना हे करावे...

  • आपल्या घरी उपलब्ध असलेले सर्व सोयाबीन  स्वच्छ निवडून पोत्यात भरुन ठेवावे. 
  • त्या प्रत्येक पोत्यातून मुठभर सोयाबीन एकत्र करून घ्यावे व त्यातील १०० दाणे मोजून घ्यावेत. हे दाणे स्वच्छ धुतलेल्या गोणपाटाच्या अर्ध्या भागावर दहाच्या संख्येने दहा ओळी करून पसरावे. प्रत्येक दाणा व ओळीमध्ये एक इंच अंतर ठेवावे. 
  • नंतर गोणपाटावर हलकेसे पाणी शिंपडून ओले करावे. 
  • उरलेल्या अर्ध्या गोणपाटाचा भाग बियाण्यावर झाकून ठेवावा किंवा अर्धा भाग कापून बियाणे असलेल्या अर्ध्या भागाची गुंडाळी करून  स्वच्छ, थंड कोरड्या जागेत पाच ते सहा दिवस ठेवावी. 
  • गोणपाट किंचीत ओलसर राहिल एवढेच पाणी आवश्यक असेल तेव्हा शिंपडावे. 
  • ५ ते ६  दिवसांनतंर गोणपाट उघडून निरीक्षण करावे. 
  • शंभर दाण्यापैकी जर ७० ते ८० पेक्षा जास्त दाणे अंकुरीत झाले असतील तर ते बियाणे पेरणीसाठी योग्य असल्याचे समजावे. असे बियाणे पेरणीसाठी एकरी ३० किलो वापरावे. 
  • जर ६० ते ७० दाणे अंकुरीत झाले असतील तर पेरणीसाठी एकरी ३५ ते ४० किलो बियाणे वापरावे. 
  • जर ६० पेक्षा कमी दाणे अंकुरीत झाले असतील तर असें बियाणे पेरणीसाठी वापरू नये. 
  • अशा दोन ते तीन चाचण्या घ्याव्यात, मगच पेरणी करावी.
  • Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com