कांदा निर्यातबंदी उठविण्यासाठी आता मुख्यमंत्र्यांना साकडे

मुख्यमंत्री उध्दव ठाकरे
मुख्यमंत्री उध्दव ठाकरे

नाशिक  : केंद्र सरकारने निर्यातबंदी केल्याने कांद्याचे दर कोसळत आहेत. एकीकडे शेतकऱ्यांचे एकरी उत्पादन घटल्याने मोठे नुकसान झाले आहे, त्यातच कांदादरात घसरण सुरू असल्याने शेतकऱ्यांना आर्थिक फटका सहन करावा लागत आहे. केंद्र सरकारने कांद्यावरील निर्यातबंदी तातडीने उठविण्यासाठी राज्य सरकारने पाठपुरावा करावा, अशा मागणीचे लेखी निवेदन महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेचे अध्यक्ष भारत दिघोळे आणि राज्य प्रवक्ते शैलेंद्र पाटील यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना दिले.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची रविवार (ता. १६) द्वारका येथे भेट घेऊन कांदा दरात घसरण होत असल्याने शेतकरी आर्थिक कोंडीत सापडल्याचे निदर्शनास आणून दिले. मुख्यमंत्र्यांनी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांचे म्हणणे ऐकून घेत काही वेळ चर्चा केली. कांदा उत्पादकांचे मोठे नुकसान होत असून राज्य सरकारने यशस्वी मध्यस्थी करून तात्काळ कांदा निर्यातबंदी उठविण्यासाठी पाठपुरावा करावा अशी निवेदनाद्वारे मागणी केली. 

निवेदनात म्हटले आहे, की बांगलादेश व ब्रह्मदेशात कांद्याला ६० ते ७० रुपये प्रतिकिलो दर मिळत आहे. मात्र त्यातुलनेत राज्यातील कांद्याला १५ ते २० रुपये प्रतिकिलो दरम्यान दर मिळत आहे. त्यामुळे निर्यात बंदीमुळे शेतकऱ्यांचे अजून नुकसान होऊ नये, यासाठी त्वरित निर्यातबंदी हटविण्यासाठी आपण प्रयत्न करावेत, अशी मागणी कांदा उत्पादकांनी केली. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com