पावसामुळे द्राक्ष मण्यांना क्रॅकिंग गेले आहेत.
पावसामुळे द्राक्ष मण्यांना क्रॅकिंग गेले आहेत.

इंदापूर तालुक्यात ढगाळ वातावरण, पावसाचा द्राक्षपिकाला फटका

वालचंदनगर, जि. पुणे  ः ढगाळ वातावरण व दोन दिवसांपूर्वी झालेल्या रिमझिम पावसामुळे इंदापूर तालुक्याच्या पश्‍चिम भागातील द्राक्ष बागांचे नुकसान झाले आहे. तयार द्राक्षांच्या घडांमध्ये पाणी साचल्याने मणी फुटण्यास (क्रॅकिंग) सुरुवात झाली आहे.

चालू वर्षी अवकाळी पावसाने इंदापूर तालुक्यातील शेतकऱ्यांचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले. गेल्या दोन महिन्यांपूर्वी सततच्या पावसामुळे शेतकऱ्यांचा बागा वाया गेल्या होत्या. काही शेतकऱ्यांच्या  अवकाळी पावसातून प्रयत्नपूर्वक बागा वाचविल्या होत्या. त्या शेतकऱ्यांच्या बागांचे दोन दिवसांपूर्वी झालेल्या रिमझिम पावसाने नुकसान केले आहे.

पावसाचे पाणी द्राक्षांच्या घडामध्ये साचून राहिल्यामुळे द्राक्षमणी फुटण्यास (क्रॅकिंग) सुरुवात झाली आहे. तसेच, सप्टेंबर व ऑक्टोबर महिन्यामध्ये सतत पाऊस सुरू असल्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी नोव्हेंबर महिन्यात द्राक्ष बागांची छाटणी केली होती. या बागांनाही ढगाळ वातावरण व दोन दिवसांपूर्वी झालेल्या अवकाळी पावसाचा फटका बसला आहे. यामुळे परदेशात निर्यात होणाऱ्या द्राक्षांची तोडणी व्यापाऱ्यांनी थांबवली असून, शेतकरी चिंताग्रस्त झाले आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com